spot_img
ब्रेकिंग‘अवकाळी’ पावसाची पुन्हा एन्ट्री! देशासह महाराष्ट्रातील अनेक भागात धुमाकूळ

‘अवकाळी’ पावसाची पुन्हा एन्ट्री! देशासह महाराष्ट्रातील अनेक भागात धुमाकूळ

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे सध्या राज्यात पावसाने हजेरी लावली. पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शयता कायम आहे. विदर्भ, मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाने काल (२६ फेब्रुवारी) हजेरी लावली. देशासह महाराष्ट्रातील अनेक भागात सोमवारी पावसाने धुमाकूळ घातला. कडकडाट आणि वादळी वार्‍यांसह पाऊस झाला.

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुयाला रात्री आठ वाजताचे सुमारास अचानक अवकाळी पावसासह जोरदार गारपीट झाल्याने त्याचा फटका रब्बी हंगाममधील गहू, हरभरा, मकासह फळपिकांना बसला असून शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे.

विजेच्या कडकडाटासह चाळीसगाव शहरासह तालुयातील अनेक भागात हा गारपीटसह मुसळधार पाऊस झाल्याची माहिती समोर आली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुयातील पाटणा, गणेशपूर, बेलदारवाडी, बाणगाव, शिंदी आणि ओढरे गावात गारपीट झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

यात सर्वाधिक गहू आणि हरभरा पिकाला फटका बसला आहे. अचानक आलेल्या पावसाने गहू, हरभरा, संत्रा पिकाला तडाखा बसला आहे. काढणीला आलेल्या शेतपिकांना याचा फटका बसत आहे. वादळी वार्‍यामुळे संत्रा बागेत फळाची गळ झाल्याने नुकसान झाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महाराष्ट्रावर दुहेरी संकट! 3 जिल्ह्यांना उष्णतेचा इशारा तर ‘या’ सात जिल्ह्यांत अवकाळी पाऊस बरसणार

Maharashtra Weather: राज्यात हवामानाने अचानक कलाटणी घेतली असून काही जिल्ह्यांत उष्णतेची लाट तर काही...

अहिल्यानगर: महिला वनरक्षकावर हल्ला; फॉरेस्ट परिसरात काय घडलं?, धक्कादायक कारण समोर…

Crime News : देहरे (ता. अहिल्यानगर) येथील वन (फॉरेस्ट) विभागाच्या परीक्षेत्रातील सर्वे नंबर 171...

आजचे राशी भविष्य! तुमच्या नशिबात काय?, वाचा सविस्तर

मुंबई। नगर सहयाद्री:- मेष राशी भविष्य आजचा दिवस तुमच्यासाठी सक्रिय ऊर्जेचा उभारी देणारा नाही आणि तुम्ही...

भाविकांसाठी खुशखबर.! चार धाम यात्रेबाबत मोठी अपडेट

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : ३० एप्रिलपासून सुरू होणाऱ्या चार धाम यात्रेची तयारी जोरात सुरू...