spot_img
ब्रेकिंग‘अवकाळी’ पावसाची पुन्हा एन्ट्री! देशासह महाराष्ट्रातील अनेक भागात धुमाकूळ

‘अवकाळी’ पावसाची पुन्हा एन्ट्री! देशासह महाराष्ट्रातील अनेक भागात धुमाकूळ

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे सध्या राज्यात पावसाने हजेरी लावली. पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शयता कायम आहे. विदर्भ, मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाने काल (२६ फेब्रुवारी) हजेरी लावली. देशासह महाराष्ट्रातील अनेक भागात सोमवारी पावसाने धुमाकूळ घातला. कडकडाट आणि वादळी वार्‍यांसह पाऊस झाला.

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुयाला रात्री आठ वाजताचे सुमारास अचानक अवकाळी पावसासह जोरदार गारपीट झाल्याने त्याचा फटका रब्बी हंगाममधील गहू, हरभरा, मकासह फळपिकांना बसला असून शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे.

विजेच्या कडकडाटासह चाळीसगाव शहरासह तालुयातील अनेक भागात हा गारपीटसह मुसळधार पाऊस झाल्याची माहिती समोर आली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुयातील पाटणा, गणेशपूर, बेलदारवाडी, बाणगाव, शिंदी आणि ओढरे गावात गारपीट झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

यात सर्वाधिक गहू आणि हरभरा पिकाला फटका बसला आहे. अचानक आलेल्या पावसाने गहू, हरभरा, संत्रा पिकाला तडाखा बसला आहे. काढणीला आलेल्या शेतपिकांना याचा फटका बसत आहे. वादळी वार्‍यामुळे संत्रा बागेत फळाची गळ झाल्याने नुकसान झाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक! प्रियकराच्या घराबाहेर तृतीयपंथीयाची आत्महत्या

पुणे । नगर सहयाद्री:- पुण्यातील तृतीयपंथीयाला जयपूरचा तरूण आवडला. दोघांमधले प्रेम बहरले. ते दोघेही...

नैतिकता : धनुभाऊंना नाहीच; अजितदादा तुम्हाला? धनंजय मुंडेंना किती दिवस पोसणार?, चमच्यांमुळेच बीडची वाट लागली!

खंडणीखोर मुकादम, बेभान कार्यकर्ते, सत्तेचा माज असणारे नेते अन्‌‍ टुकार चमच्यांमुळेच बीडची वाट लागली!सारिपाट...

ट्रक दरीत कोसळून 10 जण ठार; कुठे घडला भयंकर अपघात!

नवी दिल्ली | नगर सह्याद्री:- कर्नाटकमध्ये बुधवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे एक...

महाराष्ट्राच्या हाती मोठं घबाड! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्यात काय-काय घडलं?

मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतल्या अनेक कंपन्यांच्या भेटी; सव्वासहा लाख कोटींवर गुंतवणूक करार मुंबई | नगर...