spot_img
अहमदनगरलंकेंच्या जनसंवाद यात्रेला राऊत, शिवाजी कर्डिलेंनी दक्षिणेचा निकाल सांगून टाकला

लंकेंच्या जनसंवाद यात्रेला राऊत, शिवाजी कर्डिलेंनी दक्षिणेचा निकाल सांगून टाकला

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री –
अहमदनगर लोकसभेसाठी महायुतीकडून खासदार सुजय विखे पाटील यांना तर महाविकास आघाडीकडून आमदार नीलेश लंके यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे लोकसभेसाठी रणांगण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके हे (सोमवारपासून) पाथर्डी तालुयातील मोहटादेवी गडावरून आपल्या प्रचाराचा शुभारंभ करत आहेत.

लंके यांच्या जनसंवाद यात्रेच्या शुभारंभासा अनेक मान्यवर आमंत्रित करण्यात आले आहेत. त्यात शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत हे ही येणार आहेत. राऊत येणार असल्याचे माजी आमदार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा निका सांगून टाकला आहे.

आ. निलेश लंक यांच्या जनसंवाद यात्रेच्या शुभारंभाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभारी अंकुश काकडे यांची उपस्थिती असणार आहे. मात्र संजय राऊतांच्या उपस्थितीवरून भाजपा नेते शिवाजी कर्डीले यांनी जोरदार टीका केली आहे.

शिवाजी कर्डिले म्हणाले की, निलेश लंके हे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून उभे राहिले आहेत. त्यामुळे नेत्यांच्या त्यांच्या प्रचाराला यावे लागणार आहे. परंतु संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंचे शिवसेनेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. संजय राऊत ज्या ठिकाणी जातात त्याठिकाणच्या उमेदवाराला १०० टक्के अपयश येते. ते जर लंके यांच्या जनसंवाद यात्रेला येणार असतील तर अहमदनगर दक्षिण लोकसभेचा निकाल उद्याच लागला असं समजावं, अशी टीका त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...