spot_img
राजकारणदिशा सालियन-आदित्य ठाकरे प्रकरणी राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांचं मोठं वक्तव्य,...

दिशा सालियन-आदित्य ठाकरे प्रकरणी राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या..

spot_img

मुंबई / नगरसह्याद्री : दिशा सालियन मृत्यूप्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. याचे कारण म्हणजे यात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचे नाव जोडले जात आहे. त्यांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने एसआयटी देखील स्थापन केली आहे. त्यामुळे पुढच्या काही काळात आदित्य ठाकरे यांची चौकशी होणार आहे. आता यामध्ये राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केल आहे. त्या म्हणाल्या की, ‘आदित्य असं काही करेल असं मला तरी वाटत नाही’.. असे वक्तव्य करत त्यांनी आदित्य ठाकरेंवर विश्वासच दाखवला आहे.

राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेश नागपूरमध्ये सुरू असून यात दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा मुद्दा सत्ताधाऱ्यांनी उचलून धरला आहे. याने पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबाच्या अडचणी वाढल्या आहेत. दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरे यांची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीमध्ये अपर पोलीस आयुक्त राजीव जैन, उपायुक्त अजय बंसल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी देवेन भारती हे एसआयटीवर लक्ष ठेवून राहणार आहेत.

‘उद्योग कर उद्योग कार्यक्रमा’साठी शर्मिला ठाकरे आल्या होत्या. याच संपूर्ण प्रकरणावर माध्यमांनी आदित्य ठाकरे यांच्या काकू, राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना प्रश्न विचारला. त्यावर बोलताना त्या म्हणाल्या, चौकशा तर कुणीही लावेल. आम्हीही या प्रकारातून गेलो आहोत. पण आदित्य असं काही करेल असं मला तरी वाटत नाही, अशी प्रतिक्रिया शर्मिला ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

गँगस्टर छोटा राजनचा साथीदारस बेड्या; ‘असा’ अडकला जाळ्यात

मुंबई ।नगर सहयाद्री:- गँगस्टर छोटा राजनचा जवळचा साथीदार कुख्यात गुंड डीके रावला अटक करण्यात...

श्रीरामपुरात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे; तीन महिन्यात तीन गोळीबार!

श्रीरामपुर । नगर सहयाद्री:- निवृत्ती नंतर सुखी, सुरक्षित राहण्यासाठी नावलौकिक असलेल्या श्रीरामपूर शहरात काय...

सैफवरील हल्ला संशयास्पद! मंत्री नितेश राणेंची शंका; अजितदादा काय म्हणाले?

पुणे नगर सहयाद्री:- अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ल्या झाल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली होती....

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! ३१ जानेवारीपर्यंत ‘हे’ काम करा; अन्यथा लाभ मिळणार नाही?

PM Kisan Yojana: केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठी असलेली महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी...