spot_img
अहमदनगरAhmednagar Politics : 'भ्रष्टाचारमुक्त महापालिकेसाठी भाजपाचाच पर्याय'

Ahmednagar Politics : ‘भ्रष्टाचारमुक्त महापालिकेसाठी भाजपाचाच पर्याय’

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : महानगरपालिकेत रोज कोणत्या न कोणत्या घोटाळ्याची माहिती उघडकीस येत आहे. याला आता जनता कंटाळली असून नगरकरांना आता स्वच्छ, प्रामाणिक समाजाचे काम करणारा सेवक हवा आहे. भारतीय जनता पार्टी नगरकरांच्या अपेक्षा पूर्ण करेल. श्वान निर्बीजीकरणापासून फेज टू च्या प्रश्नांवर आता पालिका प्रशासनाला जाब विचारला पाहिजे. या सर्वांची चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे. महापालिकेच्या गैरकारभारावर कोणीतरी आवाज उठविला पाहिजे तो आवाज भारतीय जनता पार्टी उठवेल. भ्रष्टाचारमुक्त महापालिकेसाठी भाजपाचाच पर्याय असल्याचे प्रतिपादन भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष ॲड. अभय आगरकर यांनी केले.

पारिजात चौक ते टेलीफोन ऑफिस पर्यंत नगरसेवक रामदास आंधळे यांच्या प्रयत्नातून बसवण्यात आलेल्या पेव्हिंग ब्लॉक कामाचा लोकार्पण सोहळा भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष ॲड. अभय आगरकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, महिला आघाडीचे अध्यक्ष प्रिया जानवे, भाजपचे सरचिटणीस सचिन पारखी, महेश नामदे, शहर चिटणीस छायाताई राजपूत, सावेडी मंडळ अध्यक्ष नितीन शेलार, उपाध्यक्ष अनिरुद्ध घैसास, माजी नगरसेवक बाळासाहेब गायकवाड, आकाश सोनवणे, राहुल आंधळे, गोकुळ काळे, शिरीष दानवे, अभिजीत दरेकर, बबन नांगरे, महेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.

माजी महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले की, नगरसेवक रामदास आंधळे यांनी प्रभाग २,४,५,६ मध्ये विकासाची कामे मार्गी लावली आहे. त्यांच्या माध्यमांतून उपनगरात अनेक विकास कामे सुरूच राहणार असून त्यासाठी नगरसेवक रामदास आंधळे हे सक्षम नेतृत्व मिळाले आहे. नुकतेच त्यांची पक्षाच्या कोषाध्यक्ष पदी निवड झाली आहे. त्या माध्यमातून देखील आता पक्षाची ध्येय धोरणे सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम ते करतील असे ते म्हणाले.

नगरसेवक रामदास आंधळे म्हणाले की, सामाजिक काम करण्याची सुरुवातीपासून आवड असल्याने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागात विकास कामे करण्याची संधी मिळाली. पुढे देखील सामाजिक कार्य असेच सुरु ठेवणार असून आता नगरसेवक पदासह पक्षाची मोठी जबाबदारी वरिष्ठांनी मला दिली आहे. त्या माध्यमातून देखील जनसेवेची संधी मिळाली असल्याने आनंद वाटतो. माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी प्रभागातील विकास कामाकरिता मोठा निधी उपलब्द करून दिला त्या माध्यमातून आज हि कामे पूर्ण होताना दिसत आहे असे ते म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मनपा, झेडपी निवडणुकांचा ढोल वाजला

फेर प्रभाग रचना करण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे सरकारला निर्देश मुंबई | नगर सह्याद्री स्थानिक स्वराज्य संस्थांच्या...

मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला निवडणुकीचा प्लान!, युती होणार नाही, त्या..

Maharashtra politics: चार महिन्याच्या आत महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, असे कोर्टाने आदेश...

अर्बन बँक घोटाळा प्रकरण: पुन्हा महत्वाची अपडेट,आरोपींवर कारवाई करा! मुख्यमंत्र्यांनाकडे कोणी केली मागणी? पहा..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री: - नगर अर्बन (मल्टीस्टेट) को-ऑप. बँक (अहमदनगर) अहिल्यानगर ही नगर जिल्ह्यातील...

‘अहिल्यानगर मनपा आरोग्यात राज्यात पाचव्या क्रमांकावर’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालयातर्फे दरमहा जाहीर होणाऱ्या आरोग्य कार्यक्रमांच्या राज्यस्तरीय...