spot_img
देशपंतप्रधान मोदींच्या खात्यात आहेत फक्त 574 रुपये ! कसलाही पगार घेत...

पंतप्रधान मोदींच्या खात्यात आहेत फक्त 574 रुपये ! कसलाही पगार घेत नाहीत, पहा मोदींची एकूण श्रीमंती

spot_img

नगर सह्याद्री टीम : आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आता जगभरात कुणाला माहिती नाही असे कुणी सापडणार नाही. त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने आपला मोठा ठसा उमटवला आहे.

सध्या अनेकांना प्रश्न पडतो की मोदी हे पंतप्रधान आहेत तर मग त्यांचा पगार किती ? त्यांच्याखे किती रुपयांची इस्टेट आहे ? तर येथे आपण त्याबद्दल माहिती पाहू. पंतप्रधान मोदी हे कसलाही पगार घेत नाहीत. होय हे खरे आहे. एका रिपोर्टनुसार ते संपूर्ण रक्कम दान करतात.

पंतप्रधानांनी आपली संपत्ती जाहीर केली आहे. यानुसार, कुठल्याही प्रकारची जीवन विमा पॉलिसी त्यांच्याकडे नाही असे दिसते, त्यांची विमा पॉलिसी मॅच्युअर होऊन यातून जे काही पैसे मिळाले, ते त्यांनी आपल्या एफडी खात्यात जमा केले असावेत असे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

संपत्तीबाबतच्या नव्या घोषणेनुसार, पंतप्रधान मोदींच्या या वर्षाच्या 31 मार्चपर्यंत एसबीआय गांधीनगर शाखेतील एफडी खात्यात 2.47 कोटी रुपये होते. गेल्या वर्षभरात या खात्यात 37 लाख रुपयांची वाढ झाली आहे. मोदी यांचे फक्त एसबीआय गांधीनगर शाखेत खाते आहे. दुसरे कोणतेही त्यांचे खाते नाही.

मोदींवर कसलेही कर्ज नाही, वाहन नाही आणि जमीनही नाही. त्यांच्याकडे २० हजार रुपयांचे बॉण्ड होते. बँक बॅलन्सबद्दल बोलायचे झाले तर पीएम मोदींकडे फक्त 574 रुपये आहेत.

यावर्षी 31 मार्चपर्यंत त्यांच्याकडे 30 हजार 240 रुपयांची रोकड होती. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे पंतप्रधान मोदींसह मोदी सर्व केंद्रीय मंत्री त्यांची आणि त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची संपत्ती आणि कर्ज हे स्वेच्छेने घोषित करत असतात.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...

आ. दाते यांनी घेतली शेतकऱ्यांच्या मागणीची दखल! ‘या’ योजनेचा स्थानिक शेतकऱ्यांना फायदा होणार..

पारनेर । नगर सहयाद्री:- खडकवाडी गावातील शेतकऱ्यांनी पाझर तलावातील गाळ काढण्याची मागणी अनेक दिवसांपासून...

‘जलसंपदा विभागाची महामंडळे स्वायत्त होणार’; मंत्री विखे पाटील यांची मोठी माहिती..

पुणे । नगर सहयाद्री:- राज्यातील जलसंपदा विभागाची महामंडळे स्वायत्त करण्यात येणार आहेत. त्यासाठी समिती...