spot_img
अहमदनगरAhmadnagar Politics: राजकारण तापले! आ. थोरातांच्या बालेकिल्ल्यात मंत्री विखे पाटलांचा 'गौप्यस्फोट', दिवसा...

Ahmadnagar Politics: राजकारण तापले! आ. थोरातांच्या बालेकिल्ल्यात मंत्री विखे पाटलांचा ‘गौप्यस्फोट’, दिवसा मातोश्री, सायंकाळी सिल्वर ओक आणि रात्री भाजप..

spot_img

संगमनेर | नगर सह्याद्री
अहमदनगर, शिर्डी लोकसभा मतदारसंघात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अशातच आता नवनवीन गौप्यस्फोट होत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात सध्या दिवसा मातोश्री, सायंकाळी सिल्वर ओकवर आणि रात्री भाजपच्या लोकांसोबत असतात, अशी सध्या त्यांची अवस्था आहे. थोरात भाजपात आले तर स्वागतच आहे, त्यांचे आता भाजपासोबत आतून संबंध प्रस्थापित झाले आहेत, फक्त प्रवेशाची औपचारिकता बाकी आहे, असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

विखे पाटील यांनी संगमनेर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना हा दावा केला आहे. नगर जिल्ह्यात प्रचारसभेसाठी आलेले वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना विखे पाटील पिता-पुत्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असल्याचा दावा करीत थोरात यांना सावध राहण्याचा सल्ला दिला होता. यावर बोलताना थोरात यांनी आपल्याही कानावर तसे आल्याचे म्हटले होते तर विखे पाटील यांनी उलट थोरात यांचाच भाजपमध्ये येण्याचा प्रयत्न असल्याचा दावा केला होता.

या विषयावर पत्रकारांनी विखे पाटील यांना प्रश्न विचारले असता ते म्हणाले, थोरात सध्या दिवसा मातोश्री, सायंकाळी सिल्वर ओकवर आणि रात्री भाजपच्या लोकांसोबत असतात. अशी सध्या त्यांची अवस्था आहे. त्यामुळे त्यांना कोणी गांभीर्याने घेत नाही. मुळात थोरात यांची भाजपमध्ये येण्याची इच्छा होती, पण भाजपमध्ये त्यांना कोणी घेत नाहीत. ते जर भाजपमध्ये आले तर स्वागतच आहे.त्यांचे आजच भाजपासोबत आतून संबंध प्रस्थापित झाले आहेत. आता फक्त औपचारिकता बाकी आहे, असेही विखे पाटील म्हणाले.

पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, असे भाकित केले आहे. त्यासंबंधी विचारले असता विखे पाटील म्हणाले, पवार यांच्या लक्षात आले आहे की, त्यांच्या पक्षाचा एकही उमेदवार निवडून येणार नाही. त्यामुळे ते हतबल झाले आहेत. त्यांच्या या विधानावर आम्ही काही बोलण्यापेक्षा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीच उत्तर दिलेले चांगलेले राहील. पवार यांच्यासोबत आता किती सहकारी राहिलेत? खरी राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यासोबत आहे.पवार यांनी १९९९ मध्ये काँग्रेस पक्ष सोडला त्यावेळी सोनिया गांधी यांच्या विदेशी असण्याचा मुद्दा होता.

आता एवढ्या वर्षानंतर त्यांना काय उपरती झाली की ते पुन्हा काँग्रेससोबत हात मिळवणी करीत आहेत. त्यांच्या भूमिकेत सातत्य नाही. त्यामुळे त्यांची अशी अवस्था झाली आहे. पवार काँग्रेसोबत येणार म्हणून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चिंता करण्याची गरज नाही. पटोले पुन्हा भाजपमध्ये येऊ शकतात, अशी टिप्पणीही विखे पाटील यांनी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राजकारणात खळबळ!, शरद पवार-अजित पवार आज एकत्र येणार?

मुंबई । नगर सहयाद्री:- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी काल...

नागरिकांनो सतर्क राहा! हवामान खात्याचा हादरवणारा रिपोर्ट; ‘या’ जिल्ह्यांना हाय अलर्ट?

Weather Update: राज्यातील तापमानात घट झाली असून उकाड्यातही दिलासा मिळाला आहे. आज मध्य महाराष्ट्र...

शरद पवारांच्या वक्तव्यावर मंत्री विखे पाटलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, ‘दोघं एकत्र आले तर…’

Politics News: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा राज्यात खूप रंगल्या असताना, गुरुवारी राज्याचे जलसंपदा...

आजचे राशी भविष्य! ‘मे’ महिन्यातील उत्तम दिन, ‘या’ राशीच्या जीवनात मोठे बदल घडणार

मुंबई। नगर सह्याद्री मेष राशी तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यास लाभदायक दिवस. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची...