spot_img
ब्रेकिंगPolitical News : एकनाथ शिंदे-राज ठाकरे फेब्रुवारीत एकत्र येणार? राजकीय चर्चांना उधाण

Political News : एकनाथ शिंदे-राज ठाकरे फेब्रुवारीत एकत्र येणार? राजकीय चर्चांना उधाण

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री :
Political News Today : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकत्र येतील अशी चर्चा आहे. राज ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्या अलीकडील काळात अनेक भेटी झाल्या. काल पुन्हा एकदा राज ठाकरे हे शिंदे यांच्या भेटीला गेले होते.

जवळपास तासभर त्यांच्यात चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान आता आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना-मनसे फेब्रुवारी महिन्यात एकत्र येतील, हे दोन्ही नेते एकत्र येऊ शकतील असा दावा केला आहे. राज ठाकरे यांनी जाहीर भाषणात आणि पत्रकार परिषदांमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या बंडाचं समर्थन केलं होतं.

तर, शिवसेना उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीसोबत गेल्यावरुन टोलाही लगावला होता. दरम्यान मनसे व उद्धव ठाकरे एकत्र येतील असे म्हटले जात होते. पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेना आणि मनसे एकत्र येईल असा दावा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलाय.

राज ठाकरे यांनी गुरुवारी सकाळी ‘वर्षा’वर जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी शिंदे यांनी राज यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. राज ठाकरे यांच्यासोबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर उपस्थित होते. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दुकाने आणि आस्थापनावरील मराठी भाषेतील पाट्या, टोलनाके, धारावी झोपडपट्टी पुनर्विकास आदी मुद्यांसह सद्य राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याचे समजते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आ. दातेंनी विधानसभेत मांडली शेतकऱ्यांची व्यथा; पारनेर तालुक्यात बोगस बियाणे विकणारे दलाल; ‘त्यांचा…’

पारनेर । नगर सहयाद्री:- आमदार काशिनाथ दाते यांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे भक्कमपणे...

मर्चंट्स बँकेला रिझर्व्ह बँकेकडून ‌’शेड्यूल्ड बँक‌’ दर्जा प्राप्त

विश्वासार्हता, कार्यक्षमता आणि व्यावसायिक विस्तारात वाढ होणार: हस्तीमल मुनोत अहिल्यानगर । नगर सहयाद्री अहिल्यानगरच्या आर्थिक क्षेत्रात...

भिंगार शहरासाठी आता स्वतंत्र नगरपालिका; जिल्हा नियोजन समितीतून मिळणार निधी

अहिल्यानगर । नगर सहयाद्री येथील भिंगार शहरासाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र...

निळवंडे ८२ तर जायकवाडी ७0 टक्के भरले; भंडारदरा धरणात किती पाणीसाठा?, वाचा सविस्तर

आहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मराठवाड्यासाठी जीवनदायिनी असणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणात पाणीसाठा वाढत आहे....