spot_img
ब्रेकिंगPolitcs News : ''देवेंद्र फडणवीसांचा दिल्ली दरबारात अपमान'', अन्यायांची यादीच वाचली

Politcs News : ”देवेंद्र फडणवीसांचा दिल्ली दरबारात अपमान”, अन्यायांची यादीच वाचली

spot_img

जुन्नर / नगर सह्याद्री : सध्या केंद्रात भाजप सरकार आहे. महाराष्ट्र महायुतीचे सरकार आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक आमदार भाजपचे आहेत. परंतु सर्वाधिक आमदार असूनही आधी विरोधी पक्षात व आता उपमुख्यमंत्रीपदावर भाजप आहे. आता हाच धागा पकडत भाजपाचा दिल्ली दरबार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अपमान करत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule News) यांनी केलाय.

भाजपाने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)  यांची दोन वेळा पदावनती केली आहे, दिल्लीत एका मराठी माणसाचा अपमान केला जात असल्याने मला वाईट वाटतं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी आक्रोश मोर्चाच्या तिसऱ्या दिवसाची आज (शुक्रवार, २९ डिसेंबर) सकाळी जुन्नर येथून सुरुवात झाली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्या बोलत होत्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस हे पाच वर्षे मुख्यमंत्री होते. दुर्दैवाने आता भाजपाचं सरकार असूनही ते मुख्यमंत्रीपदी कायम राहिले नाहीत. त्यांना फारसे अधिकारही दिले जात नाहीत. महाराष्ट्रातला एक कर्तृत्ववान नेता मोठा झाला,

मुख्यमंत्री झाला, परंतु, तुम्ही (भाजपा) त्यांना आता उपमुख्यमंत्री केलं आहे. तुम्ही त्यांचा आणखी किती अपमान करणार आहात? देवेंद्र फडणवीस आधी मुख्यमंत्री होते. मग तुम्ही त्यांना उपमुख्यमंत्री केलंत. त्यानंतर आता अर्धे उपमुख्यमंत्री केलं आहे. हा फडणवीस यांच्यावरचा अन्याय नाही का? मी विरोधक म्हणून बोलत नाही. एखादा नेता कष्ट करत असेल, स्वतःच्या ताकदीवर १०५ आमदार निवडून आणत असेल तर त्याचा मानसन्मान करायला नको? असा सवाल त्यांनी केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...