spot_img
ब्रेकिंगविधानसभा निवडणुकीसाठी पोलीस प्रशासन सज्ज! १५ हजार जणांवर होणार प्रतिबंधक कारवाई..

विधानसभा निवडणुकीसाठी पोलीस प्रशासन सज्ज! १५ हजार जणांवर होणार प्रतिबंधक कारवाई..

spot_img

पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची माहिती
अ. नगर । नगर सहयाद्री:-
लोकसभा निवडणुकीत पोलिसांनी पकडलेल्या लाखो रूपयांची रकमेचा तपास सुरू असून याबाबतची माहिती आयकर खात्याला कळविण्यात आलेली आहे. निवडणुकीसाठी पोलीस प्रशासनाची कायदा सुव्यवस्थेची पहिली बैठक झालेली असून लवकरच पुढील नियोजन करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीत दाखल गुन्ह्यानुसार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून रेकॉर्डवरील आरोपींचा शोध सुरू आहे.

जिल्ह्यात निवडणूक काळात अवैध दारू शस्त्रे, तसेच बेकायदा पैशाची वाहतूक करणार्‍यांवर लक्ष ठेवण्यात येणार असून यासाठी आजपासून विधानसभानिहाय भरारी पथके कार्यरत झाली आहेत. निवडणूक काळात पोलीस प्रशासन प्रत्येक गोष्टीवर करडी नजर ठेवणार आहे. यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सहा पथके कार्यरत राहणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली. तसेच जिल्ह्यातील गुन्हेगार यांच्यावर करण्यात आलेल्या प्रतिबंधक कारवाई यासह पुढील काळात करण्यात येणार्‍या विविध उपायोजना यांची माहिती दिली.

आगामी विधानभेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पोलीस ठाणे हद्दीतील सुमारे 15 हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिला आहे. तसेच काहीजणांवर तडीपारीचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहे. तर काहींवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. निवडणूक काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात गुन्हेगार यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आ. दातेंनी विधानसभेत मांडली शेतकऱ्यांची व्यथा; पारनेर तालुक्यात बोगस बियाणे विकणारे दलाल; ‘त्यांचा…’

पारनेर । नगर सहयाद्री:- आमदार काशिनाथ दाते यांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे भक्कमपणे...

मर्चंट्स बँकेला रिझर्व्ह बँकेकडून ‌’शेड्यूल्ड बँक‌’ दर्जा प्राप्त

विश्वासार्हता, कार्यक्षमता आणि व्यावसायिक विस्तारात वाढ होणार: हस्तीमल मुनोत अहिल्यानगर । नगर सहयाद्री अहिल्यानगरच्या आर्थिक क्षेत्रात...

भिंगार शहरासाठी आता स्वतंत्र नगरपालिका; जिल्हा नियोजन समितीतून मिळणार निधी

अहिल्यानगर । नगर सहयाद्री येथील भिंगार शहरासाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र...

निळवंडे ८२ तर जायकवाडी ७0 टक्के भरले; भंडारदरा धरणात किती पाणीसाठा?, वाचा सविस्तर

आहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मराठवाड्यासाठी जीवनदायिनी असणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणात पाणीसाठा वाढत आहे....