spot_img
अहमदनगरAhmadnagar Politics...जनता खड्यासारखी बाजूला काढेल!! मंत्री विखे पाटील यांचा विरोधकावर निशाणा 

Ahmadnagar Politics…जनता खड्यासारखी बाजूला काढेल!! मंत्री विखे पाटील यांचा विरोधकावर निशाणा 

spot_img

पारनेर | नगर सह्याद्री

अयोध्या राम मंदीर लोकार्पणाचा कार्यक्रम संपूर्ण भारतीयांच्या मनात नवचैतन्य निर्माण करणारा आहे. ज्यांना आपले पक्ष सांभाळता आले नाही त्यांना प्रभू रामचंद्रा बद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. पण मला खात्री आहे की अशा सर्व लोकांना देवाच्याच आशीर्वादाने खड्यासारखं वेचून बाजूला फेकल्याशिवाय जनता राहणार नाही असा विश्वास कोरठण खंडोबा येथे बोलताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते श्रीक्षेत्र कोरठाण खंडोबा या ठिकाणी देवाची महारती व मंदिर परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांशी मंत्री विखे पाटील यांनी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

मंत्री विखे पाटील म्हणाले, अयोध्या या ठिकाणी राम मंदिर व्हावे म्हणून संघर्षमय वाटचालीतून अनेक लोकांच्या प्रयत्नातून कार सेवकांच्या बलिदानातून अनेक भक्तांनी समर्पित भावनेतून काम केलं सगळ्यांच्या एकत्रित यशाचा परिणाम म्हणजेच आयोध्याला राम मंदिरात राम लल्लाची स्थापना होत आहे.

ही आपल्या सर्वांसाठी ऐतिहासिक घटना म्हटली पाहिजे. कोरठण खंडोबा देवस्थानच्या विकासासाठी यापूर्वीही निधी उपलब्ध करून दिला आहे. देवस्थानच्या पुढील काळात विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सावधान नगरकरांनो! शहरातील भेसळयुक्त तुपाचा पर्दाफाश, पुण्यात तयार करून नगर शहरात विक्री

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री:- नगर शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे....

नगरमध्ये चाललंय काय? पोलिसांची गुंडागिरी?, दुकानदाराला मारहाण!, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद..

राहाता । नगर सहयाद्री:- राहाता तालुक्यातील कोल्हार गावात एका पोलीस हवालदाराने दुकान बंद करण्याच्या...

आजचे राशी भविष्य! आजचा दिवस नवीन यशांनी भरलेला, वाचा कोणाच्या आयुष्यात येणार भरभराट?

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य आपल्या संवेदनशील वागण्याने आयुष्याला अर्थ प्राप्त होतो हे...

अहमदनगर नव्हे आता अहिल्यानगर रेल्वेस्थानक, रेल्वेस्टेशनचेही नाव बदलले, सरकारकडून प्रक्रिया पूर्ण

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : अहिल्यानगरचे नामांतर केल्यानंतर आता रेल्वेस्थानकाच्या नामांतराचीही प्रक्रिया पूर्ण झाली आहे....