spot_img
ब्रेकिंगआता 'ही' माझी शेवटची निवडणूक; माजी मंत्री शिवाजी कर्डिले स्पष्ट्च बोलले..

आता ‘ही’ माझी शेवटची निवडणूक; माजी मंत्री शिवाजी कर्डिले स्पष्ट्च बोलले..

spot_img

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:-
नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने लवकर शेतकऱ्यांना दुधाच्या जोडधंद्यासाठी मदत व्हावी यासाठी पशुखाद्य कारखाना टाकण्यासाठी पुढाकार घेणार आहे, या माध्यमातून शेतकऱ्यांना 50 टक्के सवलतीच्या दरात खाद्य उपलब्ध होईल जिरायत दुष्काळी भागाला न्याय देण्याचे काम माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले आहे ही त्यांची शेवटची निवडणूक असून त्यांनी आपल्यासाठी गेली 25 वर्ष त्याग, संघर्ष केला आहे, आता आपल्यावर परतफेड करायची वेळ आली आहे, आजची सभा ही पावसात झाली असून ते आता नक्कीच निवडून येणार आहे आणि त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आमच्यावरही आहे त्यांनी देखील प्रत्येक निवडणुकीत मतदारसंघ बदलून निवडून येण्याचे काम केले, ही बाब सोपी नाही असे प्रतिपादन मा. खा. सुजय विखे पाटील यांनी केले.

नगर तालुक्यातील कापूरवाडी पिंपळगाव उज्जैनी पोखर्डी ते छत्रपती संभाजीनगर महामार्गपर्यंत रस्ता मजबुतीकरण कामाचा शुभारंभ माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, बाजार समितीचे चेअरमन भाऊसाहेब बोठे, व्हाईस चेअरमन रभाजी सुळ, हरिभाऊ कर्डिले, संतोष म्हस्के, विलास शिंदे, कैलास पठारे, शिवाजी दुशिंगे, गोविंद वाघ, इस्माईल शेख, आदेश वाघ, मिनीनाथ दुशिंगे, मोनिका आढाव, सुभाष आढाव, बाळासाहेब वाघ, जगन्नाथ मगर, प्रयाग लोंढे, सुधीर भापकर, भाऊसाहेब ठोंबरे, मंजाबापू घोरपडे, दीपक कार्ले, आदेश भगत यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

मा. खा. सुजय विखे पाटील पुढे बोलताना म्हणाले, मला कधीच पदाचा मोह नव्हता, मी राजकारणातून युवा पिढीच्या उज्वल भविष्यासाठी काम करायचे स्वप्न पाहिलेले असून नगर जिल्ह्याचे चित्र बदलायचे आहे, मी मागील निवडणुकीमध्ये विकास कामाचे दिलेले शब्द पूर्ण केले, तेव्हाच दुसऱ्या निवडणुकीला जनतेसमोर मत मागायला आलो होतो, मात्र दुधाच्या अनुदानाचे सॉफ्टवेअर नवीन होते, त्यामुळे शेतकऱ्यांना अडचण झाली आता खटाखट पैसे येतात, आता कांद्याला देखील चांगला बाजार आहे, मी खचणारा माणूस नसून माझी ओळखी पदापेक्षा मोठी आहे, मी लोकांच्या मनामध्ये विकास कामाच्या माध्यमातून स्थान निर्माण केले आहे, नगर तालुक्याचे चित्र माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी विकास कामातून बदललेले आहे, गेल्या 25 वर्षात शेती, डीपी, शाळा खोल्या, वाड्यावस्त्यांपर्यंत रस्त्यांची कामे केली असल्यामुळे ते खऱ्या अर्थाने नगर तालुक्याचे शिल्पकार आहे मी पिंपळगाव उज्जैनी गावात विकास कामासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला तरी देखील मला लोकसभेमध्ये 300 मते कमी पडली, मात्र मी कधीही विकासाच्या कामात राजकारण करत नसून जनतेचे प्रश्न सोडविणे हाच माझा प्रयत्न आहे असे सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

आता माझी ही शेवटची निवडणूक
राजकारणामध्ये अपयश येत असते. आता माझी ही शेवटची निवडणूक आहे तुम्ही मला गेली 25 वर्ष भरपूर दिले, वयाचा विचार केला पाहिजे ही निवडणूक कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव व मागणीनुसार लढणार आहे गावातील गटातटाचे राजकारण बाजूला ठेवून एकमेकांमधील मतभेद विसरून काम करा, माझ्याकडे कोणी आले तरी त्यांचे काम केले जाते गेल्या ५ वर्षांमध्ये मी आमदार नसलो तरी राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करून दिला त्यामुळे मला आमदार असल्यासारखे वाटले, विकास कामे करण्याची चिंता तुम्ही करू नका ती जबाबदारी माझी आहे.
– माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘अतिरेकी हल्याचा शिवसेनेच्यावतीने दिल्लीगेट येथे निषेध’; कोण काय म्हणाले पहा..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अतिरेक्यांचा हेतू एकच असतो, देशात भीती निर्माण करणे, दहशत पसरवणे आणि...

भ्याड हल्लेखोरांना घरात घुसून गोळ्या घाला; राष्ट्रवादीचे शहरात आंदोलन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री देशाचे नंदनवन असलेल्या काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी हिंदू पर्यटकांवर अतिरेक्यांनी हल्ला...

पारनेर तालुक्यातील ११४ गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर; वाचा सविस्तर

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुक्यातील 2025 ते 2030 या कालावधीतील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदाच्या...

कही खुशी, कही गम! नगर तालुक्यातील १०५ गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- थेट जनतेतून सरपंच निवडण्यासाठी नगर तालुक्यातील 105 गावांची आरक्षण सोडत...