spot_img
ब्रेकिंगPolitics News: थांबण्याचे नाव नाही!! ८४ उलटली ना...: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी...

Politics News: थांबण्याचे नाव नाही!! ८४ उलटली ना…: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साधला निशाणा

spot_img

कल्याण। नगर सहयाद्री
सरकारमध्ये काम करणारे ५८ पासून ७५ पर्यंतच्या वयात निवृत्ती घेतात; मात्र काहीजण ८४ वर्षे उलटली तरी थांबण्याचे नाव काढत नाहीत. आम्हालाही लोकांसाठी चांगले निर्णय घेता येतात, हे आम्ही सिद्ध केले आहे. मात्र काही जण ऐकतच नाहीत; हट्टीपणा करत राहतात, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कल्याणला रविवारी कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी पवार यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचा वाचाळवीर असा उल्लेख करताना आरक्षणाचा मुद्दा सोडविण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील असल्याचे सांगितले. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास कोणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही. मी लाभासाठी नव्हे, तर बहुजनाच्या कल्याणासाठी सरकारमध्ये सहभागी झालो आहे, असे पवार यांनी नमूद केले.

कल्याण जिल्हा घोषित करण्याची मागणी सुरू असतानाच राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदुराव यांनी, ग्रामीण भागातील ७० ग्रामपंचायतींचे वेगाने नागरिकरण होत असल्याने याची स्वतंत्र नगरपरिषद घोषित करण्याची मागणी केली. उल्हासनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पप्पू कलानी आणि ओमी कलानी यांनी मेळाव्याकडे पाठ फिरवली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खासदार निलेश लंकेंना सुजित झावरे यांचा धक्का ; विश्वासू सहकारीच लावला गळाला

ढवळपुरी गटात राजकारण फिरणार पारनेर/ नगर सह्याद्री : सुजित झावरे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ...

सेनापतींच्या विचारांची देशाची गरज : कवी इंद्रजीत भालेराव

  सेनापती बापट साहित्य संमेलनास सुरुवात सुनील चोभे / नगर सह्याद्री - सध्याच्या काळात एकूण राजकारणात आणि...

दिवसाढवळ्या महिलेचे ‘जेसीबी’ने पाडले घर तर तहसिलच्या आवारातून डंपर चोरणारे जेरबंद; वाचा अहिल्यानगर क्राईम..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- निंबोडी शिवारात एका महिला गृहिणीच्या घरावर दिवसाढवळ्या ‘जेसीबी’ फिरवल्याची घटना...

आरक्षित कोटा ठरला, आरक्षण सोडतीकडे लक्ष

34 जागांवर महिला आरक्षण | 18 जागांवर ओबीसींना संधी | 11 नोव्हेंबर रोजी सोडत अहिल्यानगर...