spot_img
अहमदनगरAhmednagar politics: शिवस्वराज्य यात्रेकडे नगरकरांची पाठ!; उलटसुलट चर्चांना उधाण, सौ. लंके म्हणाल्या...

Ahmednagar politics: शिवस्वराज्य यात्रेकडे नगरकरांची पाठ!; उलटसुलट चर्चांना उधाण, सौ. लंके म्हणाल्या…

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य घराघरात, विचार मनामनात पोहोचविण्यासाठी आमदार नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून अहमदनगर लोकसभा मतदारसंघात शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली. या यात्रेची सांगता नगरमध्ये झाली. परंतु, यात्रेमध्ये पारनेर मतदारसंघातील नागरिकांचा भरणा होता. नगर शहरात यात्रेची सांगता होत असतांनाही लंके यांच्या या यात्रेकडे नगकरांनी अक्षरशः पाठ फिरवल्याचे चित्र पहावयास मिळाले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यास ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. याबद्दल छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य घराघरात पोहोचविण्यासाठी आमदार नीलेश लंके प्रतिष्ठानमार्फत शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली. ३ जानेवारीपासून पाथर्डी येथील मोहटादेवी मंदिरापासून यात्रेस सुरुवात झाली. या शिवस्वराज्य यात्रेची सांगता नगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन सौ. राणीताई लंके यांच्या भाषणाने झाली.

ही यात्रा सक्कर चौकातून सुरू झली. यावेळी सौ. लंके यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघात नागरिकांनी शिवस्वराज्य यात्रेला दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार मानले. सांगता यात्रेमध्ये माजी सभापती सुदाम पवार, उद्योजक अजय लामखडे, शिवाजी होळकर, नितीन भांबळ, संजय जपकर, जालिंदर शिंदे, गजानन पुंड, बाबासाहेब टकले, माजी सरपंच शरद कोठुळे आदी उपस्थित होते.

नगरकरांनी फिरवली पाठ
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात आमदार नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार घराघरात पोहोचविण्यासाठी शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली. यात्रेची सांगता मंगळवारी (दि. १६) नगर शहरात झाली. यात्रेमध्ये नगर शहरातील नागरिक सहभागी होतील, अशी अपेक्षा होती. परंतु, यात्रेकडे नगरकरांनी पुर्णतः पाठ फिरवली. यात्रेत पारनेर मतदारसंघातील नागरिकच मोठ्या संख्येने दिसून आले. नगर शहरातील नागरिक यात्रेत सहभागी न झाल्याने याची कार्यक्रमस्थळी चर्चा होती.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...

संतापजनक! पंढरपूरला निघालेल्या वारीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Maharashtra Crime News: आषाढी वारीसारख्या भक्तिभावाच्या पर्वात दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे घडलेल्या एका...

आमदार रोहीत पवार यांना धक्का; जवळच्या सहकार्यावर अविश्वासाचा ठराव..

जामखेड । नगर सहयाद्री:- कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांच्यावर अविश्वास ठराव...