spot_img
अहमदनगरमनपा आक्रमक: 'इतके' नळ कनेक्शन तोडले, आयुक्तांनी दिले 'मोठे' आदेश

मनपा आक्रमक: ‘इतके’ नळ कनेक्शन तोडले, आयुक्तांनी दिले ‘मोठे’ आदेश

spot_img

अहमदनगर। नगर सह्याद्री
मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने आक्रमक कारवाई सुरू केली आहे. गेल्या १४ दिवसात मनपा प्रशासनाने २०५ थकबाकीदारांवर कारवाई केली आहे. आत्तापर्यंत १७८ मालमत्ताधारकांचे नळ कनेशन तोडण्यात आले आहे. मंगळवारी एकाच दिवसात ५२ नळ कनेशन तोडून तीन मालमत्ता जप्त केल्या आहेत.

महापालिकेची चालू वर्षात फक्त ४७ कोटींची कर वसुली झाली आहे. वसुलीचे प्रमाण १९ टक्के आहे. २०३ कोटींची थकबाकी अद्यापही बाकी आहे. इतिहासात प्रथमच १०० टक्के शास्ती माफीची योजना राबवूनही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आर्थिक अडचणीत वाढ होऊन सुविधांवर परिणाम झाला आहे.

आयुक्त तथा प्रशासक डॉ. पंकज जावळे यांनी याची गंभीर दखल घेत कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. प्रभाग अधिकारी व कर निरीक्षकांची बैठक घेऊन वसुली न केल्यास कारवाईचा इशारा दिला आहे. त्यामुळे कारवाईला गती मिळाली आहे. तसेच, आठ अभियंत्यांची चार विशेष पथके वसुली व कारवाईसाठी नियुक्त करण्यात आली आहेत.

गेल्या १४ दिवसात चारही प्रभाग अधिकार्‍यांकडून ३८५० थकबाकीदारांना नोटीसा व १६७ जप्ती वॉरंट बजावण्यात आले आहेत. यात सावेडी व बुरुडगाव प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक कारवाया करण्यात आल्या आहेत. दरम्यान, कारवाई सुरू असतानाही वसुलीत मात्र अपेक्षित वाढ झालेली नाही. दिवसभरात अवघी १३ ते १४ लाखांची वसुली होत आहे. त्यामुळे महापालिकेची आर्थिक अडचण अद्यापही कायमच आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...