spot_img
अहमदनगरमनपा आक्रमक: 'इतके' नळ कनेक्शन तोडले, आयुक्तांनी दिले 'मोठे' आदेश

मनपा आक्रमक: ‘इतके’ नळ कनेक्शन तोडले, आयुक्तांनी दिले ‘मोठे’ आदेश

spot_img

अहमदनगर। नगर सह्याद्री
मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने आक्रमक कारवाई सुरू केली आहे. गेल्या १४ दिवसात मनपा प्रशासनाने २०५ थकबाकीदारांवर कारवाई केली आहे. आत्तापर्यंत १७८ मालमत्ताधारकांचे नळ कनेशन तोडण्यात आले आहे. मंगळवारी एकाच दिवसात ५२ नळ कनेशन तोडून तीन मालमत्ता जप्त केल्या आहेत.

महापालिकेची चालू वर्षात फक्त ४७ कोटींची कर वसुली झाली आहे. वसुलीचे प्रमाण १९ टक्के आहे. २०३ कोटींची थकबाकी अद्यापही बाकी आहे. इतिहासात प्रथमच १०० टक्के शास्ती माफीची योजना राबवूनही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आर्थिक अडचणीत वाढ होऊन सुविधांवर परिणाम झाला आहे.

आयुक्त तथा प्रशासक डॉ. पंकज जावळे यांनी याची गंभीर दखल घेत कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. प्रभाग अधिकारी व कर निरीक्षकांची बैठक घेऊन वसुली न केल्यास कारवाईचा इशारा दिला आहे. त्यामुळे कारवाईला गती मिळाली आहे. तसेच, आठ अभियंत्यांची चार विशेष पथके वसुली व कारवाईसाठी नियुक्त करण्यात आली आहेत.

गेल्या १४ दिवसात चारही प्रभाग अधिकार्‍यांकडून ३८५० थकबाकीदारांना नोटीसा व १६७ जप्ती वॉरंट बजावण्यात आले आहेत. यात सावेडी व बुरुडगाव प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक कारवाया करण्यात आल्या आहेत. दरम्यान, कारवाई सुरू असतानाही वसुलीत मात्र अपेक्षित वाढ झालेली नाही. दिवसभरात अवघी १३ ते १४ लाखांची वसुली होत आहे. त्यामुळे महापालिकेची आर्थिक अडचण अद्यापही कायमच आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कोठला झोपडपट्टीत गोमांस विक्री; छाप्यात १८० किलो मांस जप्त, वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शासनाने प्रतिबंध केलेल्या गोमांस विक्रीवर तोफखाना पोलीसांनी कोठला झोपडपट्टीत मोठी...

राज्यात थंडीची लाट, तापमान १२.६ अंशांवर; कुठे किती…

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यात थंडीचा जोर वाढला असून, जळगाव, पुणे आणि नाशिकसह अनेक...

तयारीला लागा! महापालिका निवडणुकीची मोठी अपडेट समोर; आचारसंहिता कधी पहा

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, पहिल्या टप्प्यातील...

बिबट्या ठार मारा; तरच चिमुकलीवर अंत्यसंस्कार, खारे कर्जुने ग्रामस्थांचा गाव बंदचा निर्णय

खारे कर्जुने ग्रामस्थांचा निर्णय | गाव बंद | शाळा, महाविद्यालय बंद | बिबट्यांनी हादरवला...