spot_img
अहमदनगरपोळ्याच्या दिवशी गावावर शोककळा? शेतकरी कुटुंबातील तरुणाचा मृत्यू, नेमकं काय घडलं..

पोळ्याच्या दिवशी गावावर शोककळा? शेतकरी कुटुंबातील तरुणाचा मृत्यू, नेमकं काय घडलं..

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
राहाता तालुक्यातील शिंगवे येथील मिलिंद जनार्दन जाधव (वय 42) या तरुणाचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी घडल्याने ऐन पोळा सणाचे दिवशी शिंगवे गावावर शोककळा पसरली. मिलिंद जाधव हे शेतकरी कुटुंबातील असून नेहमीप्रमाणे पोळा सण असल्याने सकाळपासून गायी धुणं व रंगरंगोटी करण्याचे कामात व्यस्त होते.

त्यांनी मारुती व म्हसोबा मंदिरात जाऊन देवांना नारळ फोडले व पूजा अर्चा करून घरी गेले. घराचे पाठीमागे गेले असता पावसाची संततधार सुरू असल्याने पोलवरील विजेच्या तारेचा प्रवाहास त्यांचा संपर्क आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घरातील कुटुंबियांनी एकच आरडाओरडा केला.

त्यांना ताबडतोब शिर्डी येथील साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता त्यास मयत घोषित केले. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रति पंढरपूर पळशी तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी कटिबद्ध : सुजित झावरे पाटील

आषाढी एकादशी निमित्त आरती व महापूजा; भाविकांची अलोट गर्दी/ पारनेर पोलीस प्रशासनाचा पळशी येथे...

ठाकरे बंधू एकत्र: आजच्या सभेतील सर्व मुद्दे एकाच क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवण्या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द...

नगर शहरात मध्यरात्री अघोरी प्रकार? सीसीटीव्हीमध्ये हालचाली कैद, पहा काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी येथे अघोरी विद्या, करणी व जादूटोण्याचा घडल्याचा...

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! वाचा, जिल्ह्यात कुठे किती पाऊस?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री- मे महिन्यात अहिल्यानगरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर मात्र...