spot_img
ब्रेकिंगमनसे-महाविकास आघाडीच्या मागणीला यश; निवडणूक आयोगाचे मतदार यादीतील घोळ तपासण्याचे आदेश

मनसे-महाविकास आघाडीच्या मागणीला यश; निवडणूक आयोगाचे मतदार यादीतील घोळ तपासण्याचे आदेश

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री 
राज्यातील मतदार यादीमधील घोळ आणि गैरव्यवहाराच्या गंभीर आरोपांनंतर निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना मतदार यादीतील गैरसोयींचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सलग दोन दिवस आयोगावर प्रश्न विचारल्यानंतर या मागणीला आयोगाकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मतदार यादीतील घोटाळे उघडकीस येत असून, विशेषतः विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील यादीतील गडबड याबाबत वेगवेगळ्या वेळी मुद्दे उपस्थित केले होते. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि मनसेच्या नेत्यांनी आयोगाच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पुरावे आणि संशयास्पद नावे दाखवून गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. मुख्य निवडणूक आयुक्त चोक्कलिंगम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एकाच मतदारसंघातील एकाच व्यक्तीची अनेक ठिकाणी नावे नोंद झाल्याबाबत चौकशी करायला सांगितले आहे.

दोषी अधिकारी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी चौकशी अहवाल लवकर सादर करतील, जो येत्या आठवड्यात प्राप्त होण्याची शक्यता आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर विरोधकांना त्याची प्रत दिली जाईल. नागपूरमध्ये एकाच पत्त्यावर 200 मतदार असल्याचा आणि दहिसर, चारकोप, आणि इतर ठिकाणी काही व्यक्तींची नावे अनेक ठिकाणी असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.

या प्रकरणामुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मागणीला मोठा वेग आला आहे. मतदार यादीतील घोटाळे दूर न झाल्यास निवडणुकांचा निर्णय घेऊ नका, असे आवाहन उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले आहे. त्यांनी निवडणुकांचा पर्याय पुढे ढकलण्याचा प्रस्ताव देखील मांडला आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनीही या संदर्भात आवाज उठवला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ओबीसी आरक्षण कमी झाल्याचा पुरावा आहे का? राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - ओबीसी आरक्षणावरून शुक्रवारपासून वातावरण पुन्हा तापले आहे. बीडमध्ये ओबीसी...

अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना 846 कोटी 96 लाख रुपयांची मदत; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर...

साई संस्थानमधील ४७ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल;नेमकं प्रकरण काय?

शिर्डी । नगर सहयाद्री:- साईबाबा संस्थानच्या विद्युत विभागातील तब्बल ७७ लाख रुपयांच्या विद्युत साहित्याच्या...

केडगाव उपनगरात मध्यरात्री राडा!; कुटुंबासोबत घडलं असं काही..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील केडगाव उपनगरात शुक्रवार (दि. १७ ऑक्टोबर) पहाटेच्या सुमारास दोन...