spot_img
अहमदनगरवीज पडून मायलेकरांचा मृत्यू: मंत्री विखे पाटील यांनी घेतली कुटुंबाची भेट

वीज पडून मायलेकरांचा मृत्यू: मंत्री विखे पाटील यांनी घेतली कुटुंबाची भेट

spot_img

श्रीगोंदा । नगर सहयाद्री-
तालुक्यातील येवती येथे सोमवार दि.२२ रोजी गावामध्ये शेतकरी कुटुंबातील नवनाथ बाजीराव आढाव (वय, २६ वर्षे ) व मीनाबाई बाजीराव आढाव (वय, ५० वर्षे ) हे दोघे पावसाचे वातावरण झाले म्हणून शेतामध्ये कांदे झाकण्यासाठी गेले असता त्यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला होता.

ही बातमी वार्‍यासारखी संपूर्ण जिल्ह्यामध्ये पसरली तसेच या घटनेची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दि. २३ एप्रिल रोजी नैसर्गिक दुर्घटनेबाबत आढाव कुटुंबाची घरी जाऊन सांत्वन भेट घेतली.

यावेळी सरपंच नागेश मस्के, सरपंच विश्वास गुंजाळ, रवींद्र शिंदे, उमेश घेगडे, अनिल बनकर, बाळासाहेब महाडिक, ज्ञानेश्वर विखे पाटील, कोंडीबा ढवळे, अप्पासाहेब सातव, गणेश शिंदे, श्रीकांत जाधव, राहुल आढाव, पप्पू मस्के, जालिंदर चोरमले, ताराचंद रोटकर तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

घडलेली घटना मनाला वेदना देणारी
घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी व मनाला वेदना देणारी आहे. निसर्गाच्या पुढे कोणाचे काही चालत नाही परंतु या कुटुंबाला शासनाच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी तसेच अपघात विमा मध्ये या कुटुंबाला जास्तीत जास्त मदत भेटेल यासाठी प्रयत्न करणार आहे.
– महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आ. दातेंनी विधानसभेत मांडली शेतकऱ्यांची व्यथा; पारनेर तालुक्यात बोगस बियाणे विकणारे दलाल; ‘त्यांचा…’

पारनेर । नगर सहयाद्री:- आमदार काशिनाथ दाते यांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे भक्कमपणे...

मर्चंट्स बँकेला रिझर्व्ह बँकेकडून ‌’शेड्यूल्ड बँक‌’ दर्जा प्राप्त

विश्वासार्हता, कार्यक्षमता आणि व्यावसायिक विस्तारात वाढ होणार: हस्तीमल मुनोत अहिल्यानगर । नगर सहयाद्री अहिल्यानगरच्या आर्थिक क्षेत्रात...

भिंगार शहरासाठी आता स्वतंत्र नगरपालिका; जिल्हा नियोजन समितीतून मिळणार निधी

अहिल्यानगर । नगर सहयाद्री येथील भिंगार शहरासाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र...

निळवंडे ८२ तर जायकवाडी ७0 टक्के भरले; भंडारदरा धरणात किती पाणीसाठा?, वाचा सविस्तर

आहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मराठवाड्यासाठी जीवनदायिनी असणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणात पाणीसाठा वाढत आहे....