spot_img
अहमदनगरवीज पडून मायलेकरांचा मृत्यू: मंत्री विखे पाटील यांनी घेतली कुटुंबाची भेट

वीज पडून मायलेकरांचा मृत्यू: मंत्री विखे पाटील यांनी घेतली कुटुंबाची भेट

spot_img

श्रीगोंदा । नगर सहयाद्री-
तालुक्यातील येवती येथे सोमवार दि.२२ रोजी गावामध्ये शेतकरी कुटुंबातील नवनाथ बाजीराव आढाव (वय, २६ वर्षे ) व मीनाबाई बाजीराव आढाव (वय, ५० वर्षे ) हे दोघे पावसाचे वातावरण झाले म्हणून शेतामध्ये कांदे झाकण्यासाठी गेले असता त्यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला होता.

ही बातमी वार्‍यासारखी संपूर्ण जिल्ह्यामध्ये पसरली तसेच या घटनेची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दि. २३ एप्रिल रोजी नैसर्गिक दुर्घटनेबाबत आढाव कुटुंबाची घरी जाऊन सांत्वन भेट घेतली.

यावेळी सरपंच नागेश मस्के, सरपंच विश्वास गुंजाळ, रवींद्र शिंदे, उमेश घेगडे, अनिल बनकर, बाळासाहेब महाडिक, ज्ञानेश्वर विखे पाटील, कोंडीबा ढवळे, अप्पासाहेब सातव, गणेश शिंदे, श्रीकांत जाधव, राहुल आढाव, पप्पू मस्के, जालिंदर चोरमले, ताराचंद रोटकर तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

घडलेली घटना मनाला वेदना देणारी
घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी व मनाला वेदना देणारी आहे. निसर्गाच्या पुढे कोणाचे काही चालत नाही परंतु या कुटुंबाला शासनाच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी तसेच अपघात विमा मध्ये या कुटुंबाला जास्तीत जास्त मदत भेटेल यासाठी प्रयत्न करणार आहे.
– महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सिस्पे विरोधात ठेवीदार आक्रमक; पाच दिवसात पैसे जमा न झाल्यास…, काय दिलाय इशारा पहा

  पारनेर / नगर सह्याद्री- पारनेर, सुपा परिसरातील सुमारे चारशे कोटी रूपयांना गंडा घालणाऱ्या 'सिस्पे कंपनी'...

नगरसेवकाची आरोग्य अधिकाऱ्यास दमबाजी; मनपा कर्मचाऱ्यांनी घेतला मोठा निर्णय

मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांना दमदाटी, शिवीगाळ करण्याचे प्रकार वाढले असून संबंधितांवर कारवाई करावी - सचिव...

कामात अडथळा, जीव मारणे प्रकरणी नगरसेवक कोतकर, बोराटेंवर एफआयआर, काय घडलं पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश बाबूराव राजुरकर यांच्या तक्रारीवरून नगरसेवक...

आमदार माजलेत….; विधानसभेत फडणवीस संतापले, काय घडलं जाणून घ्या

मुंबई / नगर सह्याद्री - विधानभवनात गुरुवारी झालेल्या गोंधळामुळे संपूर्ण विधिमंडळाच्या प्रतिष्ठेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं...