spot_img
अहमदनगरवीज पडून मायलेकरांचा मृत्यू: मंत्री विखे पाटील यांनी घेतली कुटुंबाची भेट

वीज पडून मायलेकरांचा मृत्यू: मंत्री विखे पाटील यांनी घेतली कुटुंबाची भेट

spot_img

श्रीगोंदा । नगर सहयाद्री-
तालुक्यातील येवती येथे सोमवार दि.२२ रोजी गावामध्ये शेतकरी कुटुंबातील नवनाथ बाजीराव आढाव (वय, २६ वर्षे ) व मीनाबाई बाजीराव आढाव (वय, ५० वर्षे ) हे दोघे पावसाचे वातावरण झाले म्हणून शेतामध्ये कांदे झाकण्यासाठी गेले असता त्यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला होता.

ही बातमी वार्‍यासारखी संपूर्ण जिल्ह्यामध्ये पसरली तसेच या घटनेची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दि. २३ एप्रिल रोजी नैसर्गिक दुर्घटनेबाबत आढाव कुटुंबाची घरी जाऊन सांत्वन भेट घेतली.

यावेळी सरपंच नागेश मस्के, सरपंच विश्वास गुंजाळ, रवींद्र शिंदे, उमेश घेगडे, अनिल बनकर, बाळासाहेब महाडिक, ज्ञानेश्वर विखे पाटील, कोंडीबा ढवळे, अप्पासाहेब सातव, गणेश शिंदे, श्रीकांत जाधव, राहुल आढाव, पप्पू मस्के, जालिंदर चोरमले, ताराचंद रोटकर तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

घडलेली घटना मनाला वेदना देणारी
घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी व मनाला वेदना देणारी आहे. निसर्गाच्या पुढे कोणाचे काही चालत नाही परंतु या कुटुंबाला शासनाच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी तसेच अपघात विमा मध्ये या कुटुंबाला जास्तीत जास्त मदत भेटेल यासाठी प्रयत्न करणार आहे.
– महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दहा लाख चौरसफुट ओपनस्पेसचा १०० कोटींचा घोटाळा!

मनपाच्या आकृतीबंधात नगर रचनाकार हे पदच नाही, तरीही त्याला दिले सहायक संचालकांचे अधिकार |...

आ. संग्राम जगताप यांचा जैन मंदिर ट्रस्टचा भूखंड हडप करण्याचा डाव; थाटले कार्यालय, ठाकरे सेनेचा काय आहे आरोप पहा

पुणे / नगर सह्याद्री - पुण्यातील जैन हॉस्टेल भूखंड प्रकरणातून उडालेला धुरळा खाली बसत नाही...

पीएम किसान योजना; ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात येणार नाहीत पैसे, काय कारण पहा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - PM Kisan Yojana : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी पीएम किसान...

उमेदवारीसाठी इच्छुक राष्ट्रवादीच्या दारी; कोणी कोणी दिल्या मुलाखती…

२०० जणांनी दिले अर्ज; भाजप-राष्ट्रवादी युतीच्या संकेतांनंतर हालचाली वेगवान अहिल्यानगर | नगर सह्याद्री आगामी महापालिका निवडणुकीसाठी...