spot_img
अहमदनगरवीज पडून मायलेकरांचा मृत्यू: मंत्री विखे पाटील यांनी घेतली कुटुंबाची भेट

वीज पडून मायलेकरांचा मृत्यू: मंत्री विखे पाटील यांनी घेतली कुटुंबाची भेट

spot_img

श्रीगोंदा । नगर सहयाद्री-
तालुक्यातील येवती येथे सोमवार दि.२२ रोजी गावामध्ये शेतकरी कुटुंबातील नवनाथ बाजीराव आढाव (वय, २६ वर्षे ) व मीनाबाई बाजीराव आढाव (वय, ५० वर्षे ) हे दोघे पावसाचे वातावरण झाले म्हणून शेतामध्ये कांदे झाकण्यासाठी गेले असता त्यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला होता.

ही बातमी वार्‍यासारखी संपूर्ण जिल्ह्यामध्ये पसरली तसेच या घटनेची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दि. २३ एप्रिल रोजी नैसर्गिक दुर्घटनेबाबत आढाव कुटुंबाची घरी जाऊन सांत्वन भेट घेतली.

यावेळी सरपंच नागेश मस्के, सरपंच विश्वास गुंजाळ, रवींद्र शिंदे, उमेश घेगडे, अनिल बनकर, बाळासाहेब महाडिक, ज्ञानेश्वर विखे पाटील, कोंडीबा ढवळे, अप्पासाहेब सातव, गणेश शिंदे, श्रीकांत जाधव, राहुल आढाव, पप्पू मस्के, जालिंदर चोरमले, ताराचंद रोटकर तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

घडलेली घटना मनाला वेदना देणारी
घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी व मनाला वेदना देणारी आहे. निसर्गाच्या पुढे कोणाचे काही चालत नाही परंतु या कुटुंबाला शासनाच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी तसेच अपघात विमा मध्ये या कुटुंबाला जास्तीत जास्त मदत भेटेल यासाठी प्रयत्न करणार आहे.
– महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...