spot_img
ब्रेकिंगधनत्रयोदशीला आस्मानी संकट: ४८ तासात मुसळधार पाऊस कोसळणार; हवामान खात्याची महत्वाची अपडेट..

धनत्रयोदशीला आस्मानी संकट: ४८ तासात मुसळधार पाऊस कोसळणार; हवामान खात्याची महत्वाची अपडेट..

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
धनत्रयोदशीच्या दिवशी दक्षिण भारतात आसमानातून मुसळधार पावसाचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील ४८ तासांसाठी जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होऊ शकते, जे २४ ऑक्टोबर रोजी तामिळनाडूच्या उत्तरी किनाऱ्यावर आणि आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनाऱ्यावर धडकणार आहे.

या चक्रीवादळामुळे दक्षिण भारतात विशेषतः तामिळनाडू, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गोवा आणि मध्य प्रदेशच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच, वादळी वाऱ्यांचीही शक्यता असल्याने नागरिकांनी दक्षता बाळगण्याचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरात तयार होणारा कमी दाबाचा पट्टा वायव्येकडे सरकण्याचीही शक्यता आहे, ज्यामुळे हवामान आणखी विस्कळीत होऊ शकते.

उत्तर भारतात मात्र, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हिमवृष्टी आणि हलक्या रिमझिम पावसाची शक्यता असून, या भागातील तापमानात घट होण्याची शक्यता आहे. दिल्ली, राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये थंडी वाढण्याचा अंदाज आहे.

मुंबईकरांसाठी ऑक्टोबर महिन्यातील उष्णता नंतर पावसामुळे थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सध्या ३७ अंश सेल्सियस इतक्या उंचीवर असलेल्या तापमानात पुढील दोन दिवस मुंबईत यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, मुसळधार पावसामुळे हवामान थंड होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिवाळीपर्यंत मुंबईत थंडी कायम राहण्याची अपेक्षा आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ओबीसी आरक्षण कमी झाल्याचा पुरावा आहे का? राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - ओबीसी आरक्षणावरून शुक्रवारपासून वातावरण पुन्हा तापले आहे. बीडमध्ये ओबीसी...

अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना 846 कोटी 96 लाख रुपयांची मदत; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर...

मनसे-महाविकास आघाडीच्या मागणीला यश; निवडणूक आयोगाचे मतदार यादीतील घोळ तपासण्याचे आदेश

मुंबई । नगर सहयाद्री  राज्यातील मतदार यादीमधील घोळ आणि गैरव्यवहाराच्या गंभीर आरोपांनंतर निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना...

साई संस्थानमधील ४७ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल;नेमकं प्रकरण काय?

शिर्डी । नगर सहयाद्री:- साईबाबा संस्थानच्या विद्युत विभागातील तब्बल ७७ लाख रुपयांच्या विद्युत साहित्याच्या...