spot_img
ब्रेकिंगआज बैठक! महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटणार? 'त्या' चार जागांवर एकमत होणार

आज बैठक! महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटणार? ‘त्या’ चार जागांवर एकमत होणार

spot_img

Lok Sabha Election 2024: लोकसभेची निवडणूक तोंडावर आली असताना महायुतीतील घटक पक्षांत जागावाटपावरून खल सुरू आहे. विशेष बाब म्हणजे, केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थित बैठक होऊनही जागावाटपावर अद्याप तोडगा निघालेला नाही. आज ११ तारखेच्या बैठकीत अंतिम शिक्कामोर्तब होण्याचीही शक्यता आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्ली वारी करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती.शुक्रवारी रात्री (ता.८) महायुतीच्या जागावाटपाबाबत अमित शहांच्या दरबारी जवळपास दोन तास खलबंत रंगली. जागावाटपाच्या मुद्द्यावर तुटेपर्यंत न ताणण्याची तयारी भाजपकडून दाखवण्यात आली आहे. मात्र, अजूनही शिंदे आणि पवार गटांना अपेक्षित तेवढ्या जागा देण्यात भाजपने तयारी दर्शवली नाही.

सूत्रांच्या माहितीनुसार,आज मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. कदाचित आचारसंहिता सुरू होण्यापूर्वीचे ही शेवटची मंत्रिमंडळ बैठक असेल त्यानंतर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होईल. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खा. प्रफुल्ल पटेल तसेच अन्य नेते बैठकीसाठी दिल्लीला रवाना होणार आहेत.

महायुतीमध्ये तीन ते चार जागांवर एकमत होत नसल्याचे सांगितले जात आहे. आज होणार्‍या बैठकीत या जागांवर एकमत होण्याची शयता वर्तविण्यात येत आहे. त्यानंतर महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटेल, असे सांगण्यात येत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आ. दातेंनी विधानसभेत मांडली शेतकऱ्यांची व्यथा; पारनेर तालुक्यात बोगस बियाणे विकणारे दलाल; ‘त्यांचा…’

पारनेर । नगर सहयाद्री:- आमदार काशिनाथ दाते यांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे भक्कमपणे...

मर्चंट्स बँकेला रिझर्व्ह बँकेकडून ‌’शेड्यूल्ड बँक‌’ दर्जा प्राप्त

विश्वासार्हता, कार्यक्षमता आणि व्यावसायिक विस्तारात वाढ होणार: हस्तीमल मुनोत अहिल्यानगर । नगर सहयाद्री अहिल्यानगरच्या आर्थिक क्षेत्रात...

भिंगार शहरासाठी आता स्वतंत्र नगरपालिका; जिल्हा नियोजन समितीतून मिळणार निधी

अहिल्यानगर । नगर सहयाद्री येथील भिंगार शहरासाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र...

निळवंडे ८२ तर जायकवाडी ७0 टक्के भरले; भंडारदरा धरणात किती पाणीसाठा?, वाचा सविस्तर

आहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मराठवाड्यासाठी जीवनदायिनी असणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणात पाणीसाठा वाढत आहे....