spot_img
महाराष्ट्रमराठा आमदार एकवटले! मुंबईत गोपनीय बैठक? केली 'अशी' एकमुखी मागणी

मराठा आमदार एकवटले! मुंबईत गोपनीय बैठक? केली ‘अशी’ एकमुखी मागणी

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन बीड, परभणी, धाराशीव जिल्ह्यांत आंदोलकांकडून राजकीय नेत्यांना लक्ष्य केले आहे. बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागर आणि माजलगावमध्ये आमदार प्रकाश सोळंखे यांच्या घरांची जाळपोळ झाली. त्यामुळे बीड जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद करण्यासोबतच संचारबंदी लागू करण्याची वेळ आली. पंढरपूरमध्ये मंगळवारी सकाळी एका एसटी बसला आग लावली. या सगळ्या घडामोडींमुळे राज्यातील मराठा आमदार, नेते धास्तावले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत सर्वपक्षीय मराठा आमदारांची बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार बैठकीचे ठिकाण गुप्त ठेवले आहे. बैठकीत मराठा आरक्षण आंदोलनाच्या सद्यस्थितीवर चर्चा करुन पुढील रणनीती ठरवली जाण्याची शयता आहे. बैठकीनंतर सर्वपक्षीय मराठा आमदारांकडून आरक्षणासाठी राज्य सरकारवर दबाव आणला जाऊ शकतो. त्यामुळे आता बैठकीत नेमका कोणता ठराव मंजूर होतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन आतापर्यंत शिंदे गटाच्या हेमंत गोडसे आणि हेमंत पाटील या दोन खासदारांनी राजीनामे दिले आहेत.

मराठा आरक्षणासंदर्भात अध्यादेश काढण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष अधिवेशन बोलावले जाण्याची शयता आहे. या अधिवेशनाचा कालावधी तीन ते पाच दिवसांचा असू शकतो, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तत्पूर्वी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने सोमवारी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Parner: खासदार विखे शेतकऱ्यांच्या बांधावर! म्हणाले, शेतकऱ्यांना..

पारनेर। नगर सह्याद्री- तालुक्यातील महसूल व कृषी कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांना पिकांचे पंचनामे करताना कोणत्याही अडचणी येऊ...

Ahmednagar: सैनिकाला मारहाण..; नगरच्या ‘या’ भागात ‘धक्कादायक’ प्रकार

अहमदनगर | नगर सह्याद्री- सैनिकाच्या पत्नी विषयी समाजात वाईट बोलून त्यांची बदनामी केली. याबाबत जाब...

‘महसूलमंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातुन तीन कोटी निधी’

सागर मैड यांची पत्रकार परिषदेत माहिती सुपा | नगर सह्याद्री पारनेर तालुक्यातील सुपा गावात येत्या काळात...

…म्हणून प्राचीन काळात मातीच्या भांड्यांना महत्व, जाणून घ्या सविस्तर

नगर सहयाद्री टीम- प्राचीन काळात मातीच्या भांड्यांना फार महत्व दिले जात होते. बाजारात चककणारी व...