spot_img
राजकारणMaharashtra Politics : भाजपने लोकसभेसाठी सुप्रिया सुळेंविरोधात टाकला मोठा 'डाव', पडळकरांवर मोठी...

Maharashtra Politics : भाजपने लोकसभेसाठी सुप्रिया सुळेंविरोधात टाकला मोठा ‘डाव’, पडळकरांवर मोठी जबाबदारी

spot_img

पुणे / नगरसह्याद्री : भाजपने बारामतीसाठी कंबर कसली आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांना खाली खेचण्यासाठी भाजपने विविध डावपेच टाकण्यास सुरवात केली आहे. लोकसभेसाठी भाजपनं ओबीसी चेहरा प्रभारीपदी निवडला असून ही जबाबदारी नवनाथ पडळकर यांच्याकडे दिली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

राज्यात सध्या मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सध्या पाहायला मिळत आहे. बारामती लोकसभा क्षेत्रातील इंदापूर येथे झालेला ओबीसी एल्गार महामेळावा राज्यभर गाजला होता. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने नवनाथ पडळकर यांच्या रूपाने ओबीसी कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला आहे. या खेळीतून भाजपने शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात हात घातला असून सुप्रिया सुळे यांना घेरण्याची रणनीती आखली आहे.

कोण आहे नवनाथ पडळकर
बारामती लोकसभा मदारसंघ हा ओबीसीबहुल मानला जातो. धनगर समाजाचे मतदान बरेच आहे. जिनियर व उच्चविद्याविभूषित असणारे नवनाथ पडळकर हे २०१९ च्या लोकसभेतील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते. त्यांनी तिसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. त्यांच्या पाठीशी बारामती लोकसभेच्या अनुभवाची शिदोरी आहे. नुकताच त्यांनी ओबीसी, वंचित, भटक्या विमुक्त समाजाच्या विविध नेत्यांसोबत भाजपमध्ये ताकदीने प्रवेश केला होता. सध्या ते भाजपचे प्रदेश सचिव म्हणून कार्यरत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर! महत्वाचे कारण आले समोर, वाचा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था -  मागील चार ते पाच वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या...

आधी पाप केलं, आता सल्ले देऊ नका!, निवृत्ती घ्या!; शरद पवार यांच्या टीकेला मंत्री विखे पाटलांचे प्रतिउत्तर

नाशिक । नगर सहयाद्री राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या वतीने नाशिक येथे भव्य शेतकरी...

बाजारात पोहचण्याआधीच संकट; पिकअपच्या अपघाताने हादरले ‘अहिल्यानगर’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील आठवडे बाजारासाठी जात असताना सोमवारी (१५ सप्टेंबर) दुपारी साडेतीन...

दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना खुशखबर! सरकारचा मोठा निर्णय?, समोर आली अपडेट

मुंबई ।नगर सहयाद्री:- भारत हा कृषीप्रधान देश असून कोट्यवधी शेतकरी आपल्या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहेत....