spot_img
अहमदनगरराज्‍याला प्रगतीच्‍या दिशेने नेण्‍याचा संकल्‍प करुयात : पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील

राज्‍याला प्रगतीच्‍या दिशेने नेण्‍याचा संकल्‍प करुयात : पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री
राज्‍याला पुन्‍हा प्रगतीच्‍या दिशेने नेण्‍याचा संकल्‍प करुयात असा संदेश महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिला. ६५ व्‍या स्‍थापना दिवसाच्‍या निमित्‍ताने पोलिस परेड मैदानावर ध्‍वजवंदनाचा सोहळा संपन्‍न झाला.

याप्रसंगी जिल्‍हाधिकारी सिध्‍दराम सालिमठ, पोलिस अधिक्षक राकेश ओला, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍यकार्यकारी आधिकारी आशिष येरेकर, महापालिकेचे आयुक्‍त पंकज जावळे यांच्‍यासह जेष्‍ठ नागरीक आणि विविध क्षेत्रातील मान्‍यवर याप्रसंगी उपस्थित होते. मंत्री विखे पाटील यांनी पोलिस पथकाच्‍या संचलनाची पाहाणी करुन, मानवंदना स्विकारली.

याप्रसंगी बोलताना मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, महाराष्‍ट्राने नेहमीच सर्व जाती, धर्म, पंथ यांना सामावून घेत एकसंघपणे वाटचाल केली आहे. राज्‍याच्‍या भूमीने स्‍वातंत्र्य संग्रामातही मोठे योगदान दिले. सामाजिक क्रांतीच्‍या विचाराने नेहमीच एकतेचा विचार घेवून वाटचाल करणा-या राज्‍याने संत विचारांचे अधिष्‍ठान कायम ठेवले असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

राज्‍याची अर्थव्‍यवस्‍था कृषि आणि सहकारावर अवलंबुन आहे. यामुळे सामाजिक परिवर्तनात मोठी क्रांती झाली. स्‍व.यशवंतराव चव्‍हाण यांनी महाराष्‍ट्राला विकासाचा मंगल कलश आणतांना सर्वांना समान संधी उपलब्‍ध करुन दिल्‍या. त्‍यानुसार राज्‍याची वाटचाल सुरु असल्‍याचे ना.विखे पाटील म्‍हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

वैष्णवी हगवणेचा मृत्यू कसा झाला? पोस्टमार्टममधून धक्कादायक माहिती समोर

पुणे / नगर सह्याद्री - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांच्या...

धक्कादायक! मुख्याध्यापिकेनेच शिक्षक पतीला संपवलं, मृतदेह टाकला जाळून, कुठे घडला प्रकार पहा

यवतमाळ / नगर सह्याद्री - महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात एक खळबळजनक हत्याकांड उघडकीस आले आहे....

IAS पूजा खेडकर प्रकरणात मोठी अपडेट; ‘सर्वोच्च न्यायालयाने जामीन..’

मुंबई । नगर सहयाद्री:- वादग्रस्त ठरलेल्या माजी आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांना सर्वोच्च...

नगर जिल्ह्यात खळबळ! बिबट्या अडकला पिंजऱ्यात; एकाच ठिकाणी चार-चार?

अहिल्यानगर। नगर सहयाद्री :- अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार बुद्रुकमध्ये एकापाठोपाठ चार बिबटे जेरबंद करण्यात आले...