spot_img
अहमदनगरभांडणे लावणार्‍यांना कायमची अद्दल घडवा, खासदार विखे पारनेरमध्ये काय म्हणाले पहा...

भांडणे लावणार्‍यांना कायमची अद्दल घडवा, खासदार विखे पारनेरमध्ये काय म्हणाले पहा…

spot_img

निघोज | नगर सह्याद्री
पारनेर तालुयात ग्रामपंचायत असो की कोणतीही निवडणूक असो ती बिनविरोध न करता गावागावात भांडणे लावणार्‍यांना हद्दपार करण्याची वेळ आली असून लोकसभा निवडणुकीत शांतपणे व सामंजस्याने काम करीत कार्यकर्ते व जनतेने विरोधी उमेदवाराला कायमची अद्दल घडवावी असे आवाहन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

पारनेर तालुयातील अळकुटी येथील विखे पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात शुक्रवार दि. १९ रोजी सायंकाळी सात वाजता झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती काशीनाथ दाते, भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे पाटील, भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर, युवक आघाडीचे तालुका अध्यक्ष भास्करराव उचाळे, संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन वराळ पाटील, पंचायत समितीचे सदस्य दिनेश बाबर, राळेगण थेरपाळचे सरपंच पंकज कारखिले, निघोजच्या सरपंच चित्राताई वराळ पाटील, अळकुटीचे उपसरपंच बाळासाहेब धोत्रे, किसनराव कारखिले, पाडळीचे माजी सरपंच भाऊसाहेब डेरे, महिला बचत गटाच्या अध्यक्षा श्वेता वाघ, मळगंगा महिला बचत गटाच्या अध्यक्षा सोनीताई पवार, तेजस्विनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा सविता गायखे आदी असंख्य मान्यवर तसेच मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता.

बाहेर वातावरण विरोधी उमेदवाराला फार चांगले आहे हा हवेचा फुगा आहे तो फुटणार आहे. यासाठी ही निवडणूक फार महत्त्वाची आहे. आपली संस्कृती टिकवण्यासाठी आपण प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे डॉ. विखे पाटील म्हणाले. आजच्या मेळाव्याच्या माध्यमातून ज्येष्ठ मंडळी माता भगिनी यांची भेट झाली. दर्शन घेण्याचा योग मला आला, हे मी माझे भाग्य समजतो. विरोधी उमेदवार संस्कृती सोडून काम करीत आहे. गेली चार वर्षे त्यांनी तालुयातील वातावरण दूषित केले आहे. तुम्ही भावनेपोटी मतदान केले, तुमची चूक तुम्हाला उमगली आहे.

मात्र येत्या १३ मे रोजी तुम्ही विचारपूर्वक मतदान करून मला निवडून द्याल हा मला विश्वास आहे. पारनेर तालुयातून मला ५० हजार मतांचे मताधिय मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेली १० वर्षांत सर्वसामान्य जनतेला भरभरून दिले असून मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी तुमचे मतदान मृल्यवान असल्याचे खासदार डॉ. विखे पाटील म्हणाले.    राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका युवक आघाडी अध्यक्ष भास्करराव शिरोळे,  राळेगण थेरपाळचे सरपंच पंकज कारखिले यांनीही विचार व्यक्त केले. बैठकीचेे सूत्रसंचालन पंचायत समितीचे सदस्य दिनेश बाबर यांनी केले. अळकुटीचे उपसरपंच बाळासाहेब धोत्रे यांनी आभार मानले.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमधील तीन युवकांचा मृत्यू; तिरुपतीवरुन परत येतांना नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री :- अहिल्यानगर जिल्हयातील शेवगाव येथील युवकांच्या अपघताचे वृत्त समोर आले...

आमदार संजय गायकवाडांचा राडा; कँटिन ऑपरेटरला लाथा-बुक्क्‌‍यांनी मारहाण, कारण काय?

मुंबई । नगर सहयाद्री वादग्रस्त वक्तव्यांमुळे सातत्याने चर्चेत राहणारे शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड...

प्रवरेला पूर; अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ गावांचा संपर्क तुटला

संगमेनर । नगर सहयाद्री:- अकोले तालुक्यातील भंडारदरा व निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील घाटघर-रतनवाडी-हरिश्चंद्रगड-कुमशेत-साम्रद भागात...

पारनेरकरांना खुशखबर! सुजित झावरे पाटील यांच्या पाठपुराव्यास यश; ‘या’ कामांसाठी जलसंपदा विभागाची मंजुरी

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुक्यातील कुकडी डावा कालव्यावरील पुलांच्या कामांस मंजुरी देण्याचे निर्देश जलसंपदा...