spot_img
आर्थिककांदा सोडा, आता लसूण झाला 400 रुपये किलो !

कांदा सोडा, आता लसूण झाला 400 रुपये किलो !

spot_img

नगर सह्याद्री / मुंबई
कांदा मध्यंतरी 40 ते 45 रुपये किलोपर्यंत गेला होता. परंतु निर्यात बंदीमुळे सध्या हा कांदा 18 ते 22 रुपये पर्यंत आला आहे. परंतु आता लसणाने उचल खाल्ली आहे. सध्या लसूण तब्बल 400 रुपये किलो झाला आहे. कांद्याने आतापर्यंत सर्वसामान्यांना भाववाडीतून सातत्याने रडवलं. पण आता लसणाचा ठसका जोरात लागला आहे. लसणाचे भावदेखील गगनाला भिडले आहेत.

लसणाच्या किमती का वाढल्या?
प्रतिकूल हवामान आणि अवकाळी पावसाचा परिणाम लसणावर देखील झाला आहे. पिकांच्या खराब उत्पादनामुळे लसणाच्या दरात वाढ झाली आहे. मागील आठवड्यात 200 ते 250 रुपये किलो हा लसूण होता. आता तो 350 ते 400 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. दादर बाजारपेठेत हे दर आहेत. नवीन पीक बाजारात येण्यास वेळ असल्याने तोपर्यंत भाव असेच असतील असे म्हटले जात आहे.

किती वाढले दर?
मागील महिन्यात लसणाचा दर 120 ते 140 रुपये इतका होता. हाच दर 400 रुपयांवर गेला आहे. दिवाळीच्या निमित्ताने गुजरात आणि मध्यप्रदेशमधून लातुरच्या बाजारात लसूण विक्रीला आला होता. आठवड्याला किमान 100 क्विंटल लसूण बाजारात आणला गेला होता. आता हा दर 400 रुपयांवर गेला असल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सामान्यांचा आधारवड: आमदार अरुणकाका जगताप

अहिल्यानगर-  अरुणकाका आमदार अरुणकाका म्हणजे सामान्य जनतेचा आधारवड. गरिबांवरील अन्यायाच्या विरोधात उभा राहणारा, गरीब आणि...

हवामान खात्याचा इशारा आला! नगर जिल्ह्याला ‘इतक्या’ दिवसाचा यलो अलर्ट

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा अजूनही कायम असून, हवामान विभागाने पुढील...

निष्ठावंतांचं केडर जपणारे काका पुन्हा होणे नाही!

काका म्हणाले होते, ‌‘जनतेचे आशीर्वाद अन्‌‍ प्रेम मला मिळाले, सचिन आणि संग्रामला माझ्या दुप्पट...

भारतीय सैन्याने पाकिस्तानचा बुरखा फाडला; वाचा, स्पेशल रिपोर्ट

कर्नल सोफिया कुरेशी | पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण माहिती Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी...