spot_img
आर्थिककांदा सोडा, आता लसूण झाला 400 रुपये किलो !

कांदा सोडा, आता लसूण झाला 400 रुपये किलो !

spot_img

नगर सह्याद्री / मुंबई
कांदा मध्यंतरी 40 ते 45 रुपये किलोपर्यंत गेला होता. परंतु निर्यात बंदीमुळे सध्या हा कांदा 18 ते 22 रुपये पर्यंत आला आहे. परंतु आता लसणाने उचल खाल्ली आहे. सध्या लसूण तब्बल 400 रुपये किलो झाला आहे. कांद्याने आतापर्यंत सर्वसामान्यांना भाववाडीतून सातत्याने रडवलं. पण आता लसणाचा ठसका जोरात लागला आहे. लसणाचे भावदेखील गगनाला भिडले आहेत.

लसणाच्या किमती का वाढल्या?
प्रतिकूल हवामान आणि अवकाळी पावसाचा परिणाम लसणावर देखील झाला आहे. पिकांच्या खराब उत्पादनामुळे लसणाच्या दरात वाढ झाली आहे. मागील आठवड्यात 200 ते 250 रुपये किलो हा लसूण होता. आता तो 350 ते 400 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. दादर बाजारपेठेत हे दर आहेत. नवीन पीक बाजारात येण्यास वेळ असल्याने तोपर्यंत भाव असेच असतील असे म्हटले जात आहे.

किती वाढले दर?
मागील महिन्यात लसणाचा दर 120 ते 140 रुपये इतका होता. हाच दर 400 रुपयांवर गेला आहे. दिवाळीच्या निमित्ताने गुजरात आणि मध्यप्रदेशमधून लातुरच्या बाजारात लसूण विक्रीला आला होता. आठवड्याला किमान 100 क्विंटल लसूण बाजारात आणला गेला होता. आता हा दर 400 रुपयांवर गेला असल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

भाजप-राष्ट्रवादीचं ठरलं!, महापालिका निवडणुकीत युती; एमआयएमही उतरणार मैदानात

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना आता...

नेपाळमध्ये राडा! आंदोलकांनी संसद पेटवली, पंतप्रधानांचा राजीनामा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - नेपाळमधील परिस्थिती सतत बिकट होत चालली आहे. निदर्शनांनी हिंसक...

चिचोंडी पाटील उपबाजार समितीचे शुक्रवारी भूमिपूजन; आमदार कर्डिले यांची माहिती, कोण कोण राहणार उपस्थिती?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील उपबाजार समितीचे भूमिपूजन येत्या शुक्रवार दिनांक 12...

विसर्जन मिरवणुकीत युवकाचा खून; कुठे घडली घटना?

सांगली । नगर सहयाद्री:- मिरज तालुक्यातील अंकली गावात गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गटांमध्ये सुरू...