spot_img
अहमदनगर'काकासाहेब म्हस्के शैक्षणिक संकुलाचे नव्या जागेत स्थलांतर'; १६ जूनपासून महाविद्यालयीन कामकाज होणार...

‘काकासाहेब म्हस्के शैक्षणिक संकुलाचे नव्या जागेत स्थलांतर’; १६ जूनपासून महाविद्यालयीन कामकाज होणार सुरु

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
काकासाहेब म्हस्के शैक्षणिक संकुल आता चास (ता.नगर) येथील रायसोनी शैक्षणिक कॅम्पसमध्ये स्थलांतरीत करण्यात आले असून 16 जूनपासून होमिओपॅथी, फार्मसी आणि नर्सिंग या तिनही महाविद्यालयांचे नियमित कामकाज सुरू होणार असल्याची माहिती काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशनचे विश्वस्त डॉ. अभितेज सुभाष म्हस्के यांनी दिली.

डॉ. म्हस्के पुढे म्हणाले की, विद्यापीठाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार नवीन कॅम्पसमध्ये नवीन प्रवेश दिले जातील. तसेच नवीन कॅम्पसमध्ये मुलांसाठी आणि मुलींसाठी मेस सुविधा असलेल्या वसतिगृहांची व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी सांगत माजी आमदार कि.बा उर्फ काकासाहेब म्हस्के यांच्या विचारांचा वारसा जपत वैद्यकीय शिक्षण आणि सेवेचे हे व्रत कायम पुढे सुरु राहणार असल्याचे ते म्हणाले.

विश्वस्त डॉ. दिप्ती म्हस्के-ठाकरे म्हणाल्या की, 17 एप्रिल 2025 रोजी बोल्हेगाव फाटा येथील कॅम्पसमध्ये घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी होता. मात्र यावेळी संस्थेच्या व्यवस्थापनाने सर्व विद्यापीठे आणि इतर प्रशासकीय संस्थांना या दुर्दैवी घटनेची माहिती तातडीने दिली आणि प्रत्येक टप्प्यावर विद्याथ, पालक आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्याशी सतत संपर्कात राहत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तात्काळ ऑनलाईन वर्ग सुरू करण्यात आले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी व्यवस्थापनाने तात्काळ पाऊले उचलत रायसोनी शैक्षणिक कॅम्पस चास येथील सुरक्षित कॅम्पस निवडला असल्याचे त्या म्हणाल्या.

जागेचा वाद उच्च न्यायालयात
बोल्हेगाव फाटा येथील कॅम्पसबाबतचा आमचा वाद हा जागे संदर्भातचा होता आणि त्याबाबत आम्ही उच्च न्यायालयात न्याय मागितला आहे. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया सुरु असून आम्हाला विश्वास आहे की आम्हाला न्याय मिळेल. त्यानंतर लवकरच तिथे कॅम्पस सुरु करण्याचा आमचा प्रयत्न राहील असे डॉ.दिप्ती म्हस्के-ठाकरे म्हणाल्या.

विध्यार्थी, पालकांसह अनेकांची संकटकाळात साथ
काकासाहेब म्हस्के शैक्षणिक संकुलात 17 एप्रिल रोजी घडलेली घटना अत्यंत धक्कादायक होती. मात्र आम्ही सर्व विद्याथ, पालक, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने या परिस्थितीला तोंड देत यातून मार्ग काढला. या संकटकाळात सर्वांनी आमच्या पाठीशी उभे राहत आमच्यावर विश्वास दर्शविला याबद्दल आम्ही कायम या सर्वांचे ऋणी आहोत. ही घटना घडली तेव्हा आम्ही एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होवू देणार नाही याची ग्वाही दिली होती. त्यानूसार घडलेल्या प्रकारातून सावरत आम्ही पुन्हा एकदा उभे राहत असल्याची माहिती संस्थेचे सीईओ आर्किटेक्ट समीर ठाकरे यांनी दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दुचाकीच्या डिक्कीतुन साडेपाच लाख पळविले; नगरमध्ये कुठे घडली घटना पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री कृषी विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने त्याच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली ५ लाख...

पुढील 24 तास धोक्याचे… ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, हवामान खाते काय म्हणतेय पहा

मुंबई / नगर सह्याद्री - गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईसह राज्यातील काही भागांना मान्सूनच्या पावसानं...

उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; ‘या’ तारखेपासून ओला, उबेर बंद!

Taxi Ban:- कर्नाटक उच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयामुळे ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या बाईक टॅक्सी अ‍ॅग्रीगेटर्सना...

रामदेव बाबांचा धक्कादायक दावा; विमान दुर्घटनेत ‘या’ देशाचा हात?

Ramdev Baba: अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला असतानाच, योगगुरू रामदेव...