spot_img
अहमदनगरदेवाभाऊचं ठरलं; महाराष्ट्रात जल्लोष; सत्ता स्‍थापनेसाठी टोकाचे पाऊल...

देवाभाऊचं ठरलं; महाराष्ट्रात जल्लोष; सत्ता स्‍थापनेसाठी टोकाचे पाऊल…

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज राज्यात सरकार स्थापनेचा दावा केला. सत्ता स्‍थापनेचा दावा करणारे पत्र त्‍यांनी राज्‍यपाल सीपी राधाकृष्णन यांना सादर केले. उद्या (दि. ५) सायंकाळी साडेपाच वाजता मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्‍यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.



देवेंद्र फडणवीस उद्या घेणार शपथ
भाजप विधीमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची आज (दि.४) सर्वानुमते निवड झाली. विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजपच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. दरम्यान, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्या ५ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शपथ घेणार आहेत. हा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजता होईल. उद्याच्या शपथविधी सोहळ्याच्या अधिकृत निमंत्रण पत्रिकेत देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतील स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मागील काही दिवसांपासून राजकीय हालचालींना वेग आला होता. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहर्‍यावरून चांगलीच चर्चा रंगली होती. अखेर आज झालेल्या महायुतीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला कोअर कमिटीतील सर्व नेत्यांनी मंजुरी दिली आहे. फडणवीस यांची भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत.

बुधवारी विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी विधीमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये आपलं पहिलं भाषण केलं. या भाषणात त्यांनी त्यांच्यासोबत महायुतीच्या गेल्या सरकारमध्ये असलेल्या एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे आणि सर्व आमदारांचे, जनतेचे आभार मानले. यावेळी त्यांनी एक है तो सेफ है चा देखील नारा दिला.
पुढे ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आभार मानतो. ज्या प्रक्रियेनं आपण निवडून येतो, त्या संविधानाची ७५ वर्षं पूर्ण होतायत म्हणून हे महत्वाचं आहे. माझ्याकरता भारताचं संविधान सगळ्यात महत्वाचं आहे, प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिला आहे.

शपथविधी सोहळ्याला पद्मश्री पोपटराव पवार यांना निमंत्रण
राज्यातील नवीन सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी पद्मश्री पोपटराव पवार कार्याध्यक्ष आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समिती महाराष्ट्र राज्य यांना विशेष निमंत्रित करण्यात आले आहे. ५ डिसेंबरला मुंबई येथील आझाद मैदानावर मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा होत आहे.विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींना या सोहळ्यासाठी विशेष निमंत्रित करण्यात आले आहे. पद्मश्री पोपटराव पवार या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.

देवेंद्र फडणवीसांनी मानले मोदींचे आभार
एका कार्यकर्त्याला सर्वोच्च पदावर तीन वेळा पंतप्रधान मोदींनी बसवलं. अर्थात एकदा ७२ तासांसाठीच होतो. पण तरीही तांत्रिकदृष्ट्या मुख्यमंत्री होतो. त्यामुळे तीन वेळा मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर बसण्याचा मान दिला. हा पक्ष त्यांच्या नेतृत्वात मोठा झाला. त्यातूनच सामान्य कार्यकर्त्याला वेगवेगळी पदं मिळाली, काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे मी मोदींचे आभार मानतो. पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचेही आभार मानतो, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

गुरुवारी शपथविधी
०५ नोव्हेंबर २०२४ रोजी आझाद मैदानात होणार्‍या शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याच एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असे तीन लोकच शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या शपथविधीच्या सोहळ्यासाठी मुंबईतील आझाद मैदानात भव्य दिव्य तयारी करण्यात आलेली आहे. या सोहळ्यात भगवा रंगाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. सोहळ्यासाठी तीन वेगवेगळे स्टेज उभारण्यात आले आहेत. या सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्यासह केंद्रातील मंत्री आणि दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
सर्वप्रथम मी सर्व आमदारांचे आभार मानतो. सर्व आमदारांनी एकमताने माझी गटनेतेपदी निवड केली. खरं म्हणजे आपल्या सर्वांना कल्पना आहे की या वेळची निवडणूक ही ऐतिहासिक राहिली. या निवडणुकीने आपल्या समोर एक गोष्ट ठेवली. ती म्हणजे एक है तो सेफ है आणि मोदी है तो मुमकिन है. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात विजयाची मालिका ही लोकसभेनंतर पुन्हा एकदा हरियाणापासून सुरु झाली. महाराष्ट्राने जे बहुमत आपल्याला दिलं. त्याबद्दल मी महाराष्ट्राच्या जनतेला साष्टांग दंडवत घालतो. खरं म्हणजे आपल्याबरोबर एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत, त्यांचेही मी आभार मानतो, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! ३१ जानेवारीपर्यंत ‘हे’ काम करा; अन्यथा लाभ मिळणार नाही?

PM Kisan Yojana: केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठी असलेली महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी...

अजबच! अहिल्यानगर जिल्ह्यात कुत्र्यावर गुन्हा दाखल?; नेमकं काय घडलं..

आहिल्यानगर । नगर सहयाद्री:- आहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर शहर पोलीस ठाण्यात चक्क कुत्र्यावर गुन्हा दाखल करण्यात...

‘नाजूक’ संबंधामुळे संसाराला ‘तडा’! प्रियकराच्या मदतीने पतीला संपवल..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मिरजगाव (ता. कर्जत) येथे 10 जानेवारी रोजी एका 35-40 वर्षे...

धक्कादायक! प्रियकराच्या घराबाहेर तृतीयपंथीयाची आत्महत्या

पुणे । नगर सहयाद्री:- पुण्यातील तृतीयपंथीयाला जयपूरचा तरूण आवडला. दोघांमधले प्रेम बहरले. ते दोघेही...