spot_img
अहमदनगरयुवासेनेतील खदखद चव्हाट्यावर! सोशल मीडियावर 'ती' पोस्ट व्हायरल..

युवासेनेतील खदखद चव्हाट्यावर! सोशल मीडियावर ‘ती’ पोस्ट व्हायरल..

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर आली असतांनाच नगर शहर शिवसेना व युवा सेनेतील खदखद चव्हाट्यावर आली आहे. युवा सेना प्रमुख हर्षवर्धन कोतकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत वरिष्ठांचे लक्ष वेधले आहे. युवा सेनेच्या पदाधिकार्‍यांना विचारात घेतले जात नसून इतर गटातील फितूर कार्यकर्त्यांना सोबत घेतले जात असल्याचे कोतकर यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

आगामी विधानसभा निवडणूक मुदतीच होणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले असून निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून आमदार संग्राम जगताप यांची उमेदवारी अंतिम मानली जात आहे. तर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाकडून जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहर प्रमुख संभाजी कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांची नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून माजी महापौर अभिषेक कळमकर व शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांची तयारी सुरु आहेत.

नगर शहरात ठाकरे गटाची मोठी ताकद असल्याने येथील जागा महाविकास आघाडीत ठाकरे गटाला सुटण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी ठाकरे गटामध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे. परंतु, विधानसभा निवडणूक तोंडावर आली असतांनाच नगर शहर युवा सेनेतील खदखद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. शिवसेनेचे पदाधिकारी युवा सेनेच्या पदाधिकार्‍यांना विचारात घेत नसल्याचा आरोप कोतकरांकडून केला जात आहे. तसेच स्वपक्षातील पदाधिकार्‍यांना विचारात न घेता दुसर्‍या गटातील फितूर कार्यकर्त्यांना मोठेपणा दिला जात आहे. त्यामुळे आमदारकीचे स्वप्न पाहणार्‍यांनी पक्षाचे नुकसान करु नये असा टोलाही नगर शहर युवा सेना प्रमुख कोतकर यांनी लगावला आहे. कोतकर यांनी केलेल्या सोशल मीडियावरील पोस्ट नगर शहरात चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘डबल’ परताव्याचे आमिष पडले महागात; नगरच्या ३ व्यावसायिकांना ७० लाखांना गंडवले!, वाचा नगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून, श्रीगोंदा येथील...

जगताप-कोतकर कुटुंबात श्रद्धा- सबुरी हीच कर्डिलेंना श्रद्धांजली

सारिपाट / शिवाजी शिर्के प्रस्थापितांच्या विरोधात लढताना कधी थोरातांना तर कधी विखेंना घाम फोडणाऱ्या शिवाजीराव...

शेतकऱ्यांसाठी बच्चू कडूनंतर जरांगेंही आक्रमक, आंदोलनकर्त्यांनी घेतला टोकाचा निर्णय; मुख्यमंत्री म्हणाले…

'कर्जमाफीचा निर्णय सरकार घेत नाही, तोपर्यंत...; बच्चू कडू अन् समर्थकांचं 'रेल रोको' आंदोलन, नागपूर /...

मंत्री विखे पाटील यांचे संगमनेर तालुक्‍यातील कार्यकर्त्‍यांना मोठे अवाहन; स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थाच्‍या निवडणूकीतही..

संगमनेर । नगर सहयाद्री:- आपल्‍या सर्वांच्‍या योगदानामुळे राज्‍यात पुन्‍हा महायुतीचे सरकार सत्‍तेवर आले. लोकांसाठी...