spot_img
अहमदनगरतालुक्यात 'लाळ्या खुरकुत', लसीकरणाला वेग! 'हे' आहेत लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय

तालुक्यात ‘लाळ्या खुरकुत’, लसीकरणाला वेग! ‘हे’ आहेत लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय

spot_img

श्रीगोंदा| नगर सह्याद्री-
थंडीच्या दिवसांमध्ये जनावरांना लाळ्या खुरकूत या संसर्गजन्य रोगाची लागण होत असते. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपयोजना म्हणून श्रीगोंदा तालुक्यात जनावरांचे लसीकरण केले जात आहे. कोरोना काळात अनेक ठिकाणचे बाजार हे बंद होते त्यामुळे या मोहिमेला खंड पडला होता. आता हिवाळा सुरू होण्यापूर्वी या लसीकरणाला सुरुवात झाली असल्याचे पशुधन विकास अधिकारी डॉ.डी एस यांनी सांगीतले.

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने हे लसीकरण व पशु पालकांना काळजी बद्दलही मार्गदर्शन केले जात आहे. लाळ्या खुरकूत हा संसर्गजन्य रोग आहे. हिवाळ्यात याची लागण जनावरांना होत असते. तालुक्यात गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचे संकट असल्याने लसीकरण मोहिमेला खंड पडला होता मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव हा कमी झाला आहे. शिवाय तालुक्यातील साखर कारखाने हे चालू आहेत. कारखान्यावर येणार्‍या जनावरांचे लसीकरण करण्याचे काम युद्ध पातळीवर चालू आहे.

केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत लाळ खुरकूत लसीकरण मोहीम २२ डिंसेबर पासून संपूर्ण तालुक्यात राबविण्यात येत आहे. गाय आणि म्हैस जनावरांना लाळ खुरकूत लसीकरण करण्यात येत आहे. लाल खुरकूत हा जनावरांतील विषाणूजन्य आणि संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे सर्व पशुपालकांनी आपल्या जनावरांना लसीकरण करून घ्यावे. तालुक्यात २० डिंसेबर अखेर ४९००० जनावरांना लसीकरण करण्यात आले असून उर्वरित जनावरांना लसीकरण करण्याचे काम युद्ध पातळीवर चालू असुन सर्व पशुपालकांनी जनावरांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन पशुधन विकास अधिकारी डॉ. डी. एस. गाडे यांनी केले.

हे आहेत प्रतिबंधात्मक उपाय
आजही ग्रामीण भागात जनावराने अधिकची लाळ गाळली तर चप्पल जिभेवर घासली जाते. मात्र असे न करता जर या आजाराची साथ सुरू असेल तर जनावरांना चरण्यासाठी बाहेर सोडू नये. लाळ्या खुरकत झालेल्या जनावरापासून निरोगी जनावरे ही वेगळी बांधणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी पाणी न पाजता त्याची स्वतंत्र सोय करावी. ज्या ठिकाणी या आजाराने प्रादुर्भाव झालेली जनावरे बांधलेली असतात ती जागा दिवसातून किमान एकदा जंतुनाशकाने स्वच्छ धुवावी जनावरांचे दूध काढण्याचे भांडी धुण्याच्या सोड्याने व गरम पाण्याने धुऊन घ्यावीत भांड्यांचे निजंतूकिकरण होईल व रोगप्रसार टाळेल. जनावरांना लसीकरण केल्यास हा रोग शक्यता होत नाही. शेतकर्‍यांनी योग्य वेळी लसीकरण आणि योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे असे यावेळी पशुधन विकास अधिकारी डॉक्टर नितीन पवार, भाऊसाहेब चव्हाण व केशव घोडेकर यांनी लसीकरणादरम्यान मार्गदर्शन केले.

लाळ्या खुरकुताची लक्षणे

लाळया खुरकुताची लागण झाली की जनावर हे शांत राहते. नियमितपणे चारा खात नाही. पाणी पिणे बंद करते. दुभते जनावर असेल तर दुधाचे प्रमाणही कमी होते. यादरम्यानच्या काळात जनावरांच्या तोंडाच्या आतील भागाला तसेच जिभेवर फोड येतात. जनावरांच्या तोंडातून लाळ गळते. तर पुढच्या पायांच्या मध्यभागी फोड येत असुन अपंगत्व सुद्धा येऊ शकते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘नीट’ परीक्षेत कमी गुण मिळाल्याने मुख्याध्यापकाने घेतला लेकीचा जीव, कुठली घटना पहा

सांगली / नगर सह्याद्री : सांगली जिल्ह्यात ‘नीट’च्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे १६ वर्षीय...

‘जिजाऊ ब्रिगेड’चा हुंडाबळी रोखण्याचा संकल्प, पहा सविस्तर

महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आढावा बैठक अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर येथे जिजाऊ ब्रिगेड...

“युद्ध तुम्ही सुरू केलं, पण आता… ; इराणचा अमेरिकेला कडक इशारा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या इराण-इस्रायल लष्करी संघर्षात काल...

साईभक्तांसाठी आनंदाची बातमी: आता वेळ वाचणार, संस्थानकडून नवा निर्णय

शिर्डी / नगर सह्याद्री - साई संस्थानच्या या निर्णयामुळे सामान्य साईभक्तांना मोठा दिलासा मिळणार...