spot_img
अहमदनगरहिवरेबाजारकर करणार पुन्हा आदर्श काम!

हिवरेबाजारकर करणार पुन्हा आदर्श काम!

spot_img

गावकरी करणार मतदानाचे नियोजन / मतदारांसाठी वाहनेही देणार

अहमदनगर / नगर सह्याद्री
पद्मश्री पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकासात आदर्श निर्माण करणाऱ्या हिवरेबाजारमध्ये आदर्श मतदान प्रक्रिया अनुभवन्यास मिळणार आहे. विविध उमेदवारांशी समन्वय साधून त्यांच्या पोलींग एजंटांची, तसेच निवडणूक प्रक्रियेसाठी आलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांची व्यवस्था गावक-यांच्या वतीने करण्यात येणार आहे.

गावकऱ्यांच्या वतीने प्रशासन तसेच उमेदवारांना पत्र पाठवून गावामध्ये आदर्श पध्दतीने राबविण्यात येणाऱ्या मतदान प्रक्रियेबाबत अवगत करण्यात आले आहे. हिवरे बाजार करांच्या आदर्श निवडणूक प्रक्रियेमध्ये प्रत्येक उमेदवार प्रत्येक घरात जाउन त्यांचे काम मतदारांपर्यंत पोहचवू शकतो. त्याला कोणतेही बंधन नसते. मात्र मतदान प्रक्रियेमध्ये उमेदवारांच्या पोलींग एजंटची निवड गावकरी करतात. मतदारांना मतदान केंद्रापर्यंत येण्यासाठी गावकऱ्यांच्या वतीनेच वाहनांचीही व्यवस्था करण्यात येते. कोणत्याही मतदारास ठराविक मतदाराला मतदान करण्याची सक्ती करण्यात येत नाही. त्यामुळेच सन १९९७ पासून हिवरेबाजारमध्ये ९० टक्कयांपेक्षा अधिक मतदान झाले आहे.

पूर्वी संपूर्ण मतदारसंघातील गावांमध्ये झालेले मतदान एकत्र करण्यात येत असे. त्यामुळे निकालानंतर उमेदवारांमध्ये फारसे गैरसमज होत नसत. ईव्हीएम मशिनचा वापर सुरू झाल्यानंतर मात्र प्रत्येक बुथनिहाय, गावनिहाय प्रत्येक उमेदवाराला झालेले मतदान समजते. त्यामुळे कुठेतरी कमी जास्त झाले तर नाराजी नको याच भावनेतून ही व्यवस्था आमलात आणण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. पद्मश्री पोपटराव पवार हे देखील कोणाला मत द्या किंवा देऊ नका याबाबत गावकऱ्यांना काहीही सांगत नाही. प्रत्येक जण स्वतःच्या सदसदविवेक बुध्दीने मतदान करतो.

हिवरेबाजारच्या आदर्श मतदान प्रक्रियेमुळे मतदानात कुठेही बोगस मतदान, किंवा भेदभाव होत नाही. आजवरच्या निवडणूकांमध्ये सबंधित उमेदवारांना गावकऱ्यांना पुर्ण सहकार्य केलेले आहे. गावात आलेल्या उमेदवाराचे शाल नारळ देऊन स्वागत करण्यात येते. या निवडणूकीत पोलींग एजंट अथवा बुथच्या दृष्टीने उमेदवाराचे काही नियोजन असल्यास ते कळविण्याबाबतही सुचित करण्यात आले आहे.

ग्रामपंचायत निवडणूकीतही आदर्श मतदान प्रक्रिया
हिवरे बाजार ग्रामपंचायतीची ३५ वर्षानंतर निवडणूक झाली. यापूर्वी बिनविरोध निवड होत असे. या निवडणूकीतही आदर्श मतदान पध्दतीचा अवलंब करण्यात आला. प्रत्येक मतदार स्वतःच्या वाहनातून मतदानासाठी येत होता. तर वस्त्यांवरील मतदारांसाठी गावकऱ्यांच्या वतीने वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे वाद, विवाद, तंटा, भांडण, मतदारांना दारू अथवा पैशांचे आमिष या गोष्टी घडल्या नाहीत. निवडणूका या लोकशाहीच्या कणा आहेत, या पध्दतीने लोकशाही बळकट करण्याचा हिरवेबाजार ग्रामस्थांचा प्रयत्न आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब यांच्या आठव्या पुण्यस्मरण कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप’

निघोज । नगर सहयाद्री जी एस महानगर बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब...

अहमदनगर ब्रेकिंग! तलाठी आणि मंडल अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात! ‘असा’ लावला सापळा

अहमदनगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यात लाचलुचपत विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत तलाठी आणि मंडल अधिकारी...

कांद्याची महाबँक: उल्लू बनविणारा प्रयोग!अभिनव बँक, हिंदुस्थान अ‍ॅग्रो अन् शार्क माशाच्या नावाखाली भारत ढोकणेने कोट्यवधी कमावले अन् गोरगरीबांना गंडवले

अभिनव बँक, हिंदुस्थान अ‍ॅग्रो अन् शार्क माशाच्या नावाखाली भारत ढोकणेने कोट्यवधी कमावले अन् गोरगरीबांना...

बागुल पंडुगू सण तुम्हा माहित आहे का? नगरमध्ये केला जातो उत्साहात साजरा

अहमदनगर | नगर सह्याद्री:- नगर शहरात बागुल पंडुगू सण उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील तोफखाना...