spot_img
आरोग्यHealth Tips : गर्भधारणेदरम्यान डोकेदुखी का उद्भवते? तज्ञांकडून जाणून घ्या लक्षणे व...

Health Tips : गर्भधारणेदरम्यान डोकेदुखी का उद्भवते? तज्ञांकडून जाणून घ्या लक्षणे व उपाय

spot_img

नगर सह्याद्री टीम : गरोदर असणारा काळ महिलांसाठी अनेक गुंतागुंतीचा असतो. बहुतेक स्त्रिया गरोदरपणात डोकेदुखीच्या समस्येने त्रस्त असतात. काहीवेळा डोकेदुखीमुळे जास्त नुकसान होत नाही परंतु काहीवेळा ते हानिकारक ठरू शकतात. डोकेदुखीची समस्या सामान्यतः गर्भधारणेच्या दुसऱ्या तिमाहीत सुरू होते. ज्या गर्भवती महिलांना आधीच सायनसची समस्या आहे त्यांना डोकेदुखी होऊ शकते. पुरेशी झोप न मिळण्यासोबतच डिहायड्रेशनची समस्याही उद्भवते.

स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ सांगतात की, गर्भधारणेदरम्यान स्त्रीच्या शरीरात अनेक मोठे बदल होतात ज्यामुळे वेगवेगळी लक्षणे दिसून येतात आणि डोकेदुखी ही सर्वात सामान्य समस्या आहे. त्यांनी नोंदवले की 30-40% स्त्रिया गर्भधारणेदरम्यान किंवा नंतर डोकेदुखीची तक्रार करतात. या काळात अनेक महिलांना प्रीएक्लेम्प्सिया चा त्रास होतो. यामध्ये रक्तदाब खूप वाढतो. परंतु गर्भधारणेदरम्यान रक्तदाब वाढल्यास, त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ नये, बहुतेकदा हे गर्भधारणेच्या 20 आठवड्यांनंतर होते. अशा परिस्थितीत जर डोकेदुखी दूर होत नसेल तर तुम्ही डॉक्टरांना नक्कीच सांगावे.

डोकेदुखी का होते : तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार वारंवार उलट्या झाल्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता होऊ शकते, अशा स्थितीत डिहायड्रेशनमुळेही डोकेदुखी सुरू होते. याशिवाय उच्च रक्तदाब, झोप न लागणे यामुळेही डोकेदुखी होऊ शकते. गर्भधारणेदरम्यान शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात. यामुळे डोकेदुखी देखील होऊ शकते.

मायग्रेनची समस्या असेल तर अधिक काळजी घ्या. शांत झोपण्यासाठी मोबाईल, टीव्ही, टॅब इत्यादीपासून अंतर ठेवा. हलके संगीत ऐका, जे कान आणि मनाला आराम देते. वजन वाढणे, शारीरिक बदल यामुळेही डोकेदुखी सुरू होते. डोकेदुखी कोणत्याही कारणामुळे होते, कृपया तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. याशिवाय डोकेदुखीचा त्रास होत असेल तर जास्त प्रमाणात लिक्विड प्यावे. डिहायड्रेशनमुळे डोकेदुखीचा त्रास होत असेल तर शरीरात पाण्याची कमतरता भासू देऊ नका. दररोज 2-3 लिटर पाणी प्या.

बाबा रामदेव यांचा सल्ला : बाबा रामदेव यांच्या मते डोकेदुखी कमी आणि बऱ्याच प्रमाणात दूर केली जाऊ शकते. अनुलोम विलोम आणि भ्रमरी योगासन केल्याने मनाला शांती मिळते. हा प्राणायाम नियमित केल्याने मायग्रेनची समस्या दूर होते. स्वामी रामदेव यांच्यानुसार काही घरगुती उपायही करता येतात. उदाहरणार्थ, सकाळी आणि संध्याकाळी मेधावटी च्या 2-2 गोळ्या घेऊ शकतात, दुधात एक चमचा बदामाची पेस्ट घालून सकाळी पिऊ शकतात, तसेच बदाम आणि अक्रोड भिजवून देखील सेवन करू शकतात.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब यांच्या आठव्या पुण्यस्मरण कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप’

निघोज । नगर सहयाद्री जी एस महानगर बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब...

अहमदनगर ब्रेकिंग! तलाठी आणि मंडल अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात! ‘असा’ लावला सापळा

अहमदनगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यात लाचलुचपत विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत तलाठी आणि मंडल अधिकारी...

कांद्याची महाबँक: उल्लू बनविणारा प्रयोग!अभिनव बँक, हिंदुस्थान अ‍ॅग्रो अन् शार्क माशाच्या नावाखाली भारत ढोकणेने कोट्यवधी कमावले अन् गोरगरीबांना गंडवले

अभिनव बँक, हिंदुस्थान अ‍ॅग्रो अन् शार्क माशाच्या नावाखाली भारत ढोकणेने कोट्यवधी कमावले अन् गोरगरीबांना...

बागुल पंडुगू सण तुम्हा माहित आहे का? नगरमध्ये केला जातो उत्साहात साजरा

अहमदनगर | नगर सह्याद्री:- नगर शहरात बागुल पंडुगू सण उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील तोफखाना...