spot_img
महाराष्ट्रशरीरसुखाची मागणी केली, नकार देताच खून केला.. मृतदेह ऊसाच्या फडात टाकून फडच...

शरीरसुखाची मागणी केली, नकार देताच खून केला.. मृतदेह ऊसाच्या फडात टाकून फडच पेटवला

spot_img

कोल्हापूर / नगर सह्याद्री : समाजात अनेक धक्कादायक घटना घडत असतात. खून, हाणामारी अशा घटनाही दिवसेंदिवस वाढत आहेत. आता एक खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. शरीर सुखाची मागणी केली व तीने नकार देताच नराधमाने तिचा गळा आवळून खून केला. हे प्रकरण समोर येऊ नये म्हणून मृतदेह ऊसाच्या फडात टाकून फड पेटवून दिला. हा प्रकार गुरुवारी रात्री भादवण या गावात घडला.

अधिक माहिती अशी : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील भादवण या गावात मृत महिला आपल्या पतीचे निधन झाल्याने आई सोबत राहत होती. गुरुवारी (दि २८) रोजी संशयित आरोपी योगेश पांडूरंग पाटील (वय ३५ रा. भादवण) याने महिलेला उसाच्या फडात नेत शरीर सुखाची मागणी केली.

त्यावेळी पीडितेने विरोध केल्याने संशयित आरोपी योगेशने रागाच्या भरात तिचा गळा आवळून खून केला. ही घटना कोणाला कळू नये यासाठी सदरमहिलेचा मृतदेह उसाच्या फडात टाकला आणि उसाचा फड पेटवून लावत मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, सायंकाळी उसाला आग लागल्याचे कळताच गावकऱ्यांनी ते विजवण्यासाठी धाव घेतली.

आग शांत झाल्यानंतर शेतात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने गावकऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तपास सुरू केला आणि रात्री उशीरा सदर महिलेची ओळख पटली. सीसीटीव्ही व इतर काही गोष्टींच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी योगेश पाटील याला शुक्रवारी सकाळी ताब्यात घेत चौकशी केली. त्याने याबाबत कबुली दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पुणे, कोल्हापूरच्या पार्श्वभूमीवर नगरमध्ये आ. जगताप अलर्ट; आयुक्तांना पत्र देत तातडीने केली ‘ही’ मागणी

अहमदनगर / नगर सह्याद्री - गेल्या काही दिवसांपासून पुणे, मुंंबई, कोल्हापूर येथे पावसामुळे पूर...

‘ज्याला तडीपार केले त्यांच्या हातात गृहमंत्रीपद दिले’ शरद पवार यांचा अमित शाह यांच्यावर पलटवार

छ.संभाजी नगर । नगर सहयाद्री:- माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी देशाचे...

अहमदनगरच्या ‘या’ गावात धाडसी दरोडा! चोरीत चोरटे निघाले हुशार? नेमकं काय घडलं…

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- तालुक्यातील भिमा व घोडनदीच्या संगमावर असणार्या सांगवी दुमाला परिसरामध्ये धाडसी...

महाविकास आघाडीचा ढोंगीपणा उघड करण्‍याची हीच संधी! मंत्री विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला विश्‍वास

राहुरी । नगर सहयाद्री:- लोकसभा निवडणूकीत झालेल्‍या चुका पुन्‍हा होवू देवू नका, स्‍वत:च्या गावापासून काम...