spot_img
महाराष्ट्रशरीरसुखाची मागणी केली, नकार देताच खून केला.. मृतदेह ऊसाच्या फडात टाकून फडच...

शरीरसुखाची मागणी केली, नकार देताच खून केला.. मृतदेह ऊसाच्या फडात टाकून फडच पेटवला

spot_img

कोल्हापूर / नगर सह्याद्री : समाजात अनेक धक्कादायक घटना घडत असतात. खून, हाणामारी अशा घटनाही दिवसेंदिवस वाढत आहेत. आता एक खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. शरीर सुखाची मागणी केली व तीने नकार देताच नराधमाने तिचा गळा आवळून खून केला. हे प्रकरण समोर येऊ नये म्हणून मृतदेह ऊसाच्या फडात टाकून फड पेटवून दिला. हा प्रकार गुरुवारी रात्री भादवण या गावात घडला.

अधिक माहिती अशी : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील भादवण या गावात मृत महिला आपल्या पतीचे निधन झाल्याने आई सोबत राहत होती. गुरुवारी (दि २८) रोजी संशयित आरोपी योगेश पांडूरंग पाटील (वय ३५ रा. भादवण) याने महिलेला उसाच्या फडात नेत शरीर सुखाची मागणी केली.

त्यावेळी पीडितेने विरोध केल्याने संशयित आरोपी योगेशने रागाच्या भरात तिचा गळा आवळून खून केला. ही घटना कोणाला कळू नये यासाठी सदरमहिलेचा मृतदेह उसाच्या फडात टाकला आणि उसाचा फड पेटवून लावत मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, सायंकाळी उसाला आग लागल्याचे कळताच गावकऱ्यांनी ते विजवण्यासाठी धाव घेतली.

आग शांत झाल्यानंतर शेतात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने गावकऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तपास सुरू केला आणि रात्री उशीरा सदर महिलेची ओळख पटली. सीसीटीव्ही व इतर काही गोष्टींच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी योगेश पाटील याला शुक्रवारी सकाळी ताब्यात घेत चौकशी केली. त्याने याबाबत कबुली दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...

आ. दाते यांनी घेतली शेतकऱ्यांच्या मागणीची दखल! ‘या’ योजनेचा स्थानिक शेतकऱ्यांना फायदा होणार..

पारनेर । नगर सहयाद्री:- खडकवाडी गावातील शेतकऱ्यांनी पाझर तलावातील गाळ काढण्याची मागणी अनेक दिवसांपासून...

‘जलसंपदा विभागाची महामंडळे स्वायत्त होणार’; मंत्री विखे पाटील यांची मोठी माहिती..

पुणे । नगर सहयाद्री:- राज्यातील जलसंपदा विभागाची महामंडळे स्वायत्त करण्यात येणार आहेत. त्यासाठी समिती...