spot_img
ब्रेकिंगसरकारची निर्यात बंदी, तर शेतकर्‍यांची बाजार बंदी! शेतकरी संघर्ष समितीच्या रणनीतीकडे सर्वांचे...

सरकारची निर्यात बंदी, तर शेतकर्‍यांची बाजार बंदी! शेतकरी संघर्ष समितीच्या रणनीतीकडे सर्वांचे लक्ष..

spot_img

नाशिक | नगर सह्याद्री-
केंद्र सरकारने निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यामुळे कांद्याचे दर गडगडले. त्याचे स्थानिक पातळीवर तीव्र पडसाद उमटले. आंदोलने झाली तथापि, निर्णयात फेरबदल नाही. या पार्श्वभूमीवर शेतकरी संघर्ष समितीने ‘सरकारची निर्यात बंदी तर, शेतकर्‍यांची मार्केट बंदी’ अशा आंदोलनाची तयारी केली आहे. यासाठी बैठक आयोजित केली आहे.

निर्यात बंदीच्या निर्णयाने शेतकरी अडचणीत आला आहे. दुधाला जाहीर केलेले दर मिळत नाहीत. अन्य कृषिमालाबाबत अडचणी आहेत. या सर्व विषयावर बैठकीत चर्चा होईल. शेतीशी संबंधित प्रश्नांवरून शेतकर्‍यांचे संघटन केले जाणार आहे. शेतकर्‍यांनी आपला माल बाजार समितीत नेऊ नये, असे आंदोलन करण्याचे नियोजन आहे.

बैठकीत राजकीय पक्ष वा शेतकरी संघटनांचे पदाधिकारी सहभागी होऊ शकतात; पण त्यांना आपापले राजकीय जोडे बाजूला ठेऊन शेतकरी म्हणून सहभागी होण्यास सांगितल्याचे समितीचे पदाधिकारी दीपक पगार यांनी म्हटले आहे.कांदा निर्यात बंदी अगोदर मिळणारा दर आणि निर्यात बंदीनंतर मिळणार्‍या दरात हजार ते १२०० रुपयांची तफावत आहे.

कांद्याला चांगला भाव मिळणार असताना या निर्णयामुळे हजारो उत्पादकांचे नुकसान झाले. सध्या नवीन लाल कांद्याची बाजारात आवक वाढत आहे. त्याचे आयुर्मान कमी असते. काढणीनंतर तो लवकर बाजारात न्यावा लागतो. या परिस्थितीत माल बाजारात नेण्याच्या आंदोलनाची कशी रणनीती ठरते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर तालुक्यात बिबट्याची भीती; गावांना दिवसा वीज पुरवठा करावा

माजी सभापती अभिलाष घिगे, सरपंच भाऊसाहेब बहिरट यांची महावितरणकडे मागणी सुनील चोभे | नगर सह्याद्री गेल्या...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भिजतं घोंगडं; याचिकेवर ‘या’ तारखेला सुनावणी होणार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - स्थानिक स्वराज्य संस्थामधील आरक्षणाच्या मर्यादेबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेबाबत मोठी...

कांद्याला भावच नाही, शेतकऱ्याने काय केले पहा…

रांधेतील शेतकर्‍याने कांद्याला भाव नसल्याने पीक केले नष्ट पारनेर | नगर सह्याद्री गेल्या वर्षभरात कांद्याला सरकारने...

अजित पवार.. सगळ्यांचा नाद करा, पण अनगरकरांचा नाय!; महाराष्ट्रात राजकारण तापले, माफीनामा अन कोण काय म्हणाले..

माजी आमदारपुत्राचं उपमुख्यमंत्र्यांना आव्हान; सोलापुरात वातावरण तापलं सोलापूर | नगर सह्याद्री सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुयातील अनगर...