spot_img
ब्रेकिंगपर्यटकांसाठी खुशखबर! कळसुबाई शिखरावर मिळणार 'ही' सुविधा, सरकारचा 'मोठा' निर्णय

पर्यटकांसाठी खुशखबर! कळसुबाई शिखरावर मिळणार ‘ही’ सुविधा, सरकारचा ‘मोठा’ निर्णय

spot_img

नाशिक। नगर सहयाद्री-
स्वातंत्र्यसेनानी आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या वासाळी (ता. इगतपुरी) येथील स्मारकाच्या उभारणीसाठी ४८३ कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर कळसूबाई शिखरावर रोप वे उभारण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी राघोजी भांगरे यांच्या स्मारक कामास गती मिळावी म्हणून उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे बैठक घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार बैठक झाली. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, दिलीप वळसे-पाटील, आमदार माणिकराव कोकाटे, नितीन पवार, नितीन भुसारा, वित्त विभाग, ग्रामविकास विभागाचे सचिव, नाशिकचे जिल्हाधिकारी आदी उपस्थित होते.

आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे वासाळी येथे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून स्मारक मंजूर झाले आहे. पहिल्या टप्प्यात ३८८ कोटी ८४ लाख रुपयांचे स्मारक उभारणे व दुसर्‍या टप्प्यात उर्वरित कामासाठी ९६ कोटी रुपये निधीस मंजुरी देण्याचे निश्चित झाले होते. त्याचबरोबर स्मारक ठिकाणापासून जवळच असलेल्या कळसूबाई शिखरावर ये-जा करण्यासाठी रोप वे उभारण्याबाबत चर्चा झाली.

त्यानुसार त्याचा २११ कोटी रकमेचा स्वतंत्र डीपीआर तयार करून केंद्र सरकारच्या पर्वतमाला योजनेत मंजुरीसाठी पाठविण्याचा निर्णय झाला होता. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे स्मारकाचा सर्व खर्च सुमारे ४८३ कोटी रुपयांपर्यंत करण्यास उपमुख्यमंत्री पवार यांनी मान्यता दिली.

स्मारकाच्या देखभाल दुरुस्तीचे काम आदिवासी विभागामार्फत करण्याचे ठरले आहे. स्मारकाच्या कामकाजासाठी एक समिती बनविणार असून, त्यात पर्यटन व ग्रामविकास सचिव, वास्तुविशारद, आदिवासी भागाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार, जिल्हाधिकारी असणार आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक प्रकार: पारनेर सहकारी साखर कारखान्यातून150 कोटींचा मुद्देमाल गायब

चौकशीतून माहिती उजेडात । बचाव समितीकडून जप्तीची मागणी पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर सहकारी साखर...

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? तटकरेंनी स्पष्टचं सांगितलं, नेमकं पडद्याआड काय सुरू आहे?

मुंबई / नगर सह्याद्री : ५ जुलै २०२५ या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारण एक मोठी घडामोड...

स्वच्छ सर्वेक्षणाचा पुरस्कार मनपाने विकत आणला काय?; किरण काळेंनी केली पोलखोल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहर कचरामय झाल आहे. घंटागाड्या गायब आहेत. जागोजागी कचऱ्यांचे ढीग...

सुनेच्या नावे केलेली जमीन परत सासू-सासऱ्यांच्या नावे; न्यायाधिकरणाचा महत्वपूर्ण आदेश, काय आहे प्रकरण पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : आई - वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण प्राधिकरणाचे...