spot_img
ब्रेकिंगजिहादी हल्ल्ल्यांना सडेतोड उत्तर द्या!; आ.संग्राम जगताप

जिहादी हल्ल्ल्यांना सडेतोड उत्तर द्या!; आ.संग्राम जगताप

spot_img

कोल्हापूरमधील कानवड येथे हिंदू जन आक्रोश मोर्चात आवाहन
कोल्हापूर ।नगर सहयाद्री:-
जिहादी वृत्तीने हिंदूंवर केलेले हल्ले व अत्याचार आम्ही सहन करणार नाही. त्याच क्षणी सडेतोड उत्तर द्या!, अशा शब्दांत अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी गर्जना केली. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील कानवड येथे झालेल्या हिंदू आक्रोश मोर्चात त्यांनी प्रखर शब्दांत मनोगत व्यक्त केले.

अलीकडेच अक्षय कोळी व त्यांच्या कुटुंबावर काही जिहादी वृत्तीच्या नागरिकांनी केलेल्या जीवघेणा हल्ल्याचा व घरफोडीचा तीव्र निषेध व्यक्त करत आमदार संग्राम जगताप यांनी संताप व्यक्त केला. या मोर्चात उपस्थित नागरिकांच्या जयघोषाने वातावरण दणाणून गेले होते. आमदार जगताप यांच्या प्रभावी भाषणाने सभा गाजली. अक्षय कोळी व कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी सकल हिंदू समाज त्यांच्या पाठीशी उभे राहत असल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले.
जिहादी विचारसरणीच्या समूहाकडून नेहमीच हिंदूंवर विनाकारण हल्ले व अत्याचार केले जातात.

त्यामुळे हिंदूंच्या संरक्षणासाठी एकजूट करून लढा देणे गरजेचे आहे. त्याकरिता हिंदू समाजात जनजागृती करून अन्यायग्रस्त कुटुंबांना संरक्षण देत जिहादींच्या हिंदूंवरील हल्ला व अत्याचाराला सडेतोड उत्तर द्या, असे आवाहन आमदार जगताप यांनी यावेळी केले. हिंदू बंधू अक्षय कोळी यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर झालेला हल्ला हिंदू समाज कधीही सहन करणार नाही. या अत्याचाराला उत्तर नक्कीच दिले जाईल. ज्या पद्धतीने अत्याचार होईल त्याच पद्धतीने हिंदू समाज इथून पुढे सडेतोड उत्तर देईल.

हभप संग्राम भंडारे महाराज म्हणाले की, इस्लामी सत्ता निर्माण करण्यासाठी हिंदूंवर जाणीवपूर्वक अत्याचार करण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. आपले रक्षण करण्यासाठी हिंदू समाज एकवटला पाहिजे. त्यासाठी हिंदुत्वाच्या संघटनेने प्रत्येक गावात गल्लीबोळांत जाऊन जनजागृती केली पाहिजेत. आगामी काळात हिंदूंवर झालेल्या अत्याचार खपवून घेतले जाणार नाहीत, हे दाखवण्याची वेळ आली आहे. अक्षय कोळी व त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी संपूर्ण हिंदू समाज आहे. त्याची दखल प्रशासनाने घेऊन अक्षय कोळी यांच्यावर अत्याचार करण्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

यावेळी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने शिरोळचे तहसीलदार अनिलकुमार केळकर यांना निवेदन देण्यात आले. कानवाढ प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, पीडित कुटुंबाला तातडीने न्याय द्यावा, भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील हिंदुत्वादी संघटनांचे पदाधिकारी आणि सकल हिंदू समाज यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होता.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पक्षापेक्षा कोणीही मोठं नाही : आमदार दाते यांचे मोठे विधान

पारनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक; पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पारनेर / नगर सह्याद्री रविवार दिनांक ७...

कायनेटिक चौकातील परिसरातील नागरिकांना धोका?, माजी सभापती मनोज कोतकर मैदानात, नेमकं प्रकरण काय?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री कायनेटिक चौक परिसरातील काही भागात गेल्या 1 महिन्यापासून दूषित पाणी...

सोशल मीडिया बंदीवरुन राडा, तरुणाई संसदेत घुसली, 5 आंदोलकांचा मृत्यू

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदीवरून आक्रमक झालेल्या तरूणांनी सरकारविरोधात आंदोलन...

…अन्यथा दसरा मेळाव्यात पुढील भूमिका जाहीर करणार; जरांगे पाटलांचा सरकारला अल्टीमेटम, वाचा सविस्तर

जालना । नगर सहयाद्री:- मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आक्रमक झालेल्या मनोज जरांगे...