spot_img
अहमदनगरगेली पन्नास वर्षे विखे परिवाराने नगर जिल्ह्याला झुलवत ठेवले: आ. लंके

गेली पन्नास वर्षे विखे परिवाराने नगर जिल्ह्याला झुलवत ठेवले: आ. लंके

spot_img

टाकळीढोकेश्वर येथे जनसंवाद यात्रा
पारनेर | नगर सह्याद्री
गेली पन्नास वर्षे विखे परिवाराने संपूर्ण नगर जिल्ह्याला झुलवत ठेवले. पारनेरसह नगर, पाथर्डी तालुयात कुकडी प्रकल्पाचे पाणी भुईदंडाने आणू अशा वल्गना माजी खासदार बाळासाहेब विखे यांनी चाळीस वर्षे केल्या. मात्र ते साध्या नळानेही पाणी आणू शकले नाहीत अशी टीका आमदार नीलेश लंके यांनी केली. टाकळी ढोकेश्वर येथे जनसंवाद यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते.

टाकळीढोकेश्वरच्या सरपंच अरूणा खिलारी अध्यक्षस्थानी होत्या. आ. लंके म्हणाले की,महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर आपल्या मतदारसंघाला त्रास देण्याचा प्रयत्न केला गेला. आजही सुमारे साडेतिनशे कोटी रूपयांचा निधी रोखला आहे. विरोधकांनी हे लक्षात ठेवावे, मी सोपा नाही, लोकसभेचे मतदान झाल्यानंतर रोखलेला निधी मिळालेला असेल, असे आ. लंके यांनी ठणकावून सांगितले. मला विधानसभेत पाठविल्यानंतर सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला.

साडेचार वर्षांच्या कालखंडात सर्वाचे समाधान करू शकलो नसलो तरी संपूर्ण कार्यकाळात रात्रंदिवस परीश्रम घेतले. मतदार संघाला न्याय देण्यासाठी अथक आणि प्रामणिक प्रयत्न केले. प्रत्येक गावात किमान एक कोटी रूपयांचा निधी देण्याचा प्रयत्न केला. विधानसभेची घडी बसलेली असतानाही लोकसभेसाठी विधानसभेचा राजीनामा दिला.आपण मांडलेला डाव मोडला. आता डाव पुन्हा सावरायचा असल्याचे सांगत भावनिक आवाहन लंके यांनी केले.

तालुयातील काही असंतुष्ट आत्मे लोकांची दिशाभुल करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. आपले भवितव्य आपल्याच हातात आहे. माझा तुमच्यावर व तुमचा माझ्यावर अधिकार आहे.लोकसभा निवडणुकीत आपण झेंडा लावणारच,
आपले नाव देशात होणार आहे. धोका पत्करून आपण पुढे जात आहोत. समोरचा कडा पार करून झेंडा रोवायचा आहे. तालुयातील जनतेच्या हाती मताधिय आहे. किमान एक लाखांची आघाडी मिळाली पाहिजे. विरोधक इतर तालुयात जाऊन तालुयात लंके यांना लिड मिळणार नाही असा गैरसमज पसरवत आहेत कारण इतर तालुयातही त्यांना प्रतिसाद मिळत नाही असे आ. नीलेश लंके म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राजकारणात खळबळ!, शरद पवार-अजित पवार आज एकत्र येणार?

मुंबई । नगर सहयाद्री:- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी काल...

नागरिकांनो सतर्क राहा! हवामान खात्याचा हादरवणारा रिपोर्ट; ‘या’ जिल्ह्यांना हाय अलर्ट?

Weather Update: राज्यातील तापमानात घट झाली असून उकाड्यातही दिलासा मिळाला आहे. आज मध्य महाराष्ट्र...

शरद पवारांच्या वक्तव्यावर मंत्री विखे पाटलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, ‘दोघं एकत्र आले तर…’

Politics News: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा राज्यात खूप रंगल्या असताना, गुरुवारी राज्याचे जलसंपदा...

आजचे राशी भविष्य! ‘मे’ महिन्यातील उत्तम दिन, ‘या’ राशीच्या जीवनात मोठे बदल घडणार

मुंबई। नगर सह्याद्री मेष राशी तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यास लाभदायक दिवस. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची...