spot_img
अहमदनगरआ. संग्राम जगतापांविरोधात खोटी बातमी, सातपुतेंसह निखिल वागळेंवर गुन्हा

आ. संग्राम जगतापांविरोधात खोटी बातमी, सातपुतेंसह निखिल वागळेंवर गुन्हा

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : राहुरी येथील आढाव वकील पती-पत्नीच्या हत्येमध्ये अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या टोळीचा हात असल्याची बातमी काही युट्युब चॅनेल वरून प्रसारित करण्यात आली होती. मात्र याबाबत आता थेट राहुरी पोलिसांनी या प्रकरणाचा खुलासा केला असून ज्या प्रकरणाचा आणि आमदार संग्राम जगताप यांचा काहीही संबंध नाही. या खून प्रकरणातील प्रमुख आरोपी अटक झाले असून खून हा खंडणीच्या कारणातून झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणातील सर्व सराईत गुन्हेगार आहेत अशी माहिती राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिली आहे.

एका युट्युब चॅनलच्या माध्यमातून निखिल वागळे नामक पत्रकाराने थेट आमदार संग्राम जगताप यांच्या टोळीचा या खुनामध्ये हात असल्याचा आरोप केल्याने अहमदनगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात निखिल वागळे तसेच शिवसेना केडगाव फेसबुक चालवणारे सुनील सातपुते यांच्या विरोधात दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुरी तालुक्यातील मानोरी येथील अॅड राजाराम आढाव आणि अॅड मनीषा आढाव यांचे २५ जानेवारी रोजी राहुरी न्यायालयातून सिनेस्टाईल अपहरण करून हत्या झाल्याची घटना घडली होती. या हत्याकांडांचे राज्यभर पडसाद उमटले आहेत. त्याच अनुषंगाने ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी आपल्या यु टूब चॅनेवर स्थानिक नागरिकांचा हवाला देत सदर हत्याकांडातील टोळी ही अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांच्याशी संमधीत टोळी आहे अन् ही टोळी अजित दादा यांच्याशीही संबंधित असल्याचे खळबळजनक वक्तव्य केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती.

पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी माञ या वक्तव्याचे खंडण करत यातील मुख्य आरोपी किरण दुशिंग हा विकृत प्रवृत्तीचा असून केवळ खंडणीसाठी त्याने हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले. टोळीतील आरोपी सागर खांदे, शुभम महाडिक,हर्षल ढोकणे,बबन मोरे हे सर्व राहुरी तालुक्यातील असून आ. संग्राम जगताप यांच्याशी त्यांचा कुठलाही संबंध तपासात आढळून आलेला नाही अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राखेतून फिनिक्ससारखी भरारी — माजी सैनिक नवनाथ खामकर यांचा संकल्प एस. मार्ट पुन्हा उभा

  श्रीगोंदा / नगर सह्याद्री - राखेतून पुन्हा जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्षासारखी किमया श्रीगोंद्यात पाहायला मिळाली...

स्थानिक स्वराज्य संस्थांनच्या निवडणुका संभाजी ब्रिगेड ताकदीने लढवणार – इंजी. शामभाऊ जरे

श्रीगोंदा / नगर सह्याद्री दिवाळीनंतर होणाऱ्या नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी संभाजी ब्रिगेड...

ओबीसी आरक्षण कमी झाल्याचा पुरावा आहे का? राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - ओबीसी आरक्षणावरून शुक्रवारपासून वातावरण पुन्हा तापले आहे. बीडमध्ये ओबीसी...

अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना 846 कोटी 96 लाख रुपयांची मदत; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर...