spot_img
महाराष्ट्ररेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून पिळवणूक, शेतकरी आक्रमक ! खा. सुजय विखेंपुढे वाचला तक्रारींचा पाढा

रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून पिळवणूक, शेतकरी आक्रमक ! खा. सुजय विखेंपुढे वाचला तक्रारींचा पाढा

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : इंग्रज काळापासून रेल्वे लाईनच्या खालून पाटपाणी नेण्यासाठी असलेल्या मोऱ्या बंद करत रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांची अडवणूक आणि पिळवणूक सुरु आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झाले आहे असा आरोप करत केंद्र सरकार स्तरावर हा प्रश्न मांडून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी शिष्टमंडळाने खा.डॉ. सुजय विखे पाटील यांच्याकडे केली. सारोळा कासार येथील शेतकऱ्यांनी खा. विखे यांची भेट घेत निवेदन दिले. यावेळी माजी मंत्री व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिलेही उपस्थित होते.

या संदर्भात सारोळा कासार (ता. नगर) येथील शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, सारोळा कासार परिसरातून इंग्रज काळात रेल्वे लाईन गेलेली आहे. ज्या वेळेस रेल्वे लाईनचे काम झाले त्यावेळी रेल्वे प्रशासनाने ए, बी, सी क्लास अशा तिन प्रकारामध्ये जमीन अधिग्रहण केली.

ज्या वेळी रेल्वे लाईन झाली त्यावेळेस सर्व शेतकऱ्यांच्या एका जमिनीचे दोन भाग झालेले आहेत. त्यामुळे एका जमिनीच्या एका भागातून दुसऱ्या भागात पाटपाणी नेण्यासाठी मोऱ्या तयार करुन दिलेल्या आहेत. या मोऱ्या नं. ३३३ व ३३४ मधून शेतकरी वर्षानुवर्षे पाटपाणी नेत होते. परंतु गेल्या आठ दहा वर्षांपासून रेल्वे प्रशासनाने पाटपाणी किंवा पाईपलाईनने पाणी नेण्यासाठी बंदी घातलेली आहे.

वास्तविक परिस्थिती अशी आहे की, शेतकऱ्यांच्या एका जमिनीचे दोन भाग रेल्वे मुळे झालेले आहेत. इंग्रज काळापासून पाटपाणी एका मळ्यामधून दुसऱ्या मळ्यात नेण्यासाठी कधीही अडवणूक झाली नाही. पण सध्याच्या अधिकाऱ्यांच्या मनमानी मुळे शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे.

पाईपलाईन नेण्यासाठी शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात आर्थिक मागणीही केली जात आहे. तसेच गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. हीच परिस्थिती सर्वच रेल्वे लाईनच्या कडेला असलेल्या शेतकऱ्यांची असून हा प्रश्न केंद्र सरकार स्तरावर मांडून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आलेली आहे.

याशिवाय सारोळा अस्तगाव या दोन गावांना जोडणाऱ्या रस्त्यासाठी जुन्या दिंडी रस्त्यावर रेल्वे लाईन क्रॉस करण्यासाठी भुयारी मार्ग तयार करण्यात यावा अशीही मागणी यावेळी करण्यात आली आहे. यावेळी प्रविण काळे, गणेश काळे, सुभाष काळे, संजय धामणे, संजय काळे, श्रीरंग धामणे, मच्छिंद्र काळे, पोपट धामणे, ज्ञानदेव काळे, पांडुरंग काळे, अविनाश धामणे, मोहन काळे, संतोष काळे, बाबासाहेब धामणे, एकनाथ धामणे आदी उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

हनी ट्रॅपचा धक्कादायक प्रकार! ‘जीवनसाथी डॉट कॉम’ बनावट आयडी, पुढे घडलं असं काही..

मुंबई । नगर सहयाद्री:- हनी ट्रॅपचा वापर करत ‘जीवनसाथी डॉट कॉम’ या वेबसाइटवरून महिलांना...

महायुती सरकारचा धडाकेबाज निर्णय; गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणं हटवणार

मुंबई। नगर सहयाद्री:- महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर एकापाठोपाठ एक धडाकेबाज निर्णय घेतले आहे. साच एक...

लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर! २१०० रुपये कधी मिळणार?

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूप प्रसिद्ध झाली आहे....

आयुक्त साहेब, चमकोगिरी नको फिल्डवर काम दाखवा; कोतकर काय म्हणाले पहा…

मनोज कोतकर | मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट | आंदोलनाचा इशारा अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर शहरात भटया...