spot_img
राजकारणअमोल कोल्हेंविरोधात अजित पवारांची मोठी खेळी, 'या' मोठ्या अभिनेत्यास उभे करणार

अमोल कोल्हेंविरोधात अजित पवारांची मोठी खेळी, ‘या’ मोठ्या अभिनेत्यास उभे करणार

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून आगामी लोकसभेचे उमेदवार कोण असतील याची चर्चा सध्या चांगली रंगू लागली आहे. सध्या शिरूर मतदार संघाकडे अनेकांचे लक्ष आहे. याचे कारणही असेच आहे. येथे शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या विरोधात अजित पवार यांनी शड्डू ठोकले असून ते तेथे कोणता उमेदवार उभे करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आता अभिनेते नाना पाटेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून ऑफर देण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. शिरुर मतदारसंघातून नाना पाटेकर यांना विचारणा करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनीही महत्वाचं विधान केलं आहे. नाना पाटेकर यांच्याबद्दल त्यांनी केलेलं हे वक्तव्य सध्या खूप चर्चेत आहे.

शिरूर मतदार संघातून अजित पवार गटाकडून अभिनेते नाना पाटेकर यांना उमेदवारी देण्याची शक्यता सुरू आहे. त्यासंदर्भातील अनेक चर्चाही सुरू आहेत. यासंदर्भात शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांना प्रश्न विचारण्यात आला. ‘नाना आले तर त्यांचं स्वागतच केलं पाहिजे’ असं त्यांनी म्हटलं आहे. असं विधान करत त्यांनी चर्चेची दारं अजूनही किलकिली असल्याचे सूतोवाच केले आहे.

अभिनेते नाना पाटेकर हे मात्र शिरूर मतदारसंघातून लढण्यास फारसे उत्सुक नसल्याचे दिसत आहे. त्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही, मात्र त्यांच्या राजकारण प्रवेशाची चर्चा सध्या रंगली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आ. दातेंनी विधानसभेत मांडली शेतकऱ्यांची व्यथा; पारनेर तालुक्यात बोगस बियाणे विकणारे दलाल; ‘त्यांचा…’

पारनेर । नगर सहयाद्री:- आमदार काशिनाथ दाते यांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे भक्कमपणे...

मर्चंट्स बँकेला रिझर्व्ह बँकेकडून ‌’शेड्यूल्ड बँक‌’ दर्जा प्राप्त

विश्वासार्हता, कार्यक्षमता आणि व्यावसायिक विस्तारात वाढ होणार: हस्तीमल मुनोत अहिल्यानगर । नगर सहयाद्री अहिल्यानगरच्या आर्थिक क्षेत्रात...

भिंगार शहरासाठी आता स्वतंत्र नगरपालिका; जिल्हा नियोजन समितीतून मिळणार निधी

अहिल्यानगर । नगर सहयाद्री येथील भिंगार शहरासाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र...

निळवंडे ८२ तर जायकवाडी ७0 टक्के भरले; भंडारदरा धरणात किती पाणीसाठा?, वाचा सविस्तर

आहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मराठवाड्यासाठी जीवनदायिनी असणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणात पाणीसाठा वाढत आहे....