spot_img
ब्रेकिंगअहिल्यानगरमध्ये खळबळ! शालेय विद्यार्थ्यांसोबत घडलं भयंकर; अंगावर काटा आणणारी घटना...

अहिल्यानगरमध्ये खळबळ! शालेय विद्यार्थ्यांसोबत घडलं भयंकर; अंगावर काटा आणणारी घटना…

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील घुटेवाडी येथील एका विद्यार्थ्यांचे सकाळी अपहरण करून दुपारी मढेवडगाव येथील जंगलात सोडून दिल्याचा प्रकार घडला. शुभम घुटे असे विद्यार्थ्यांचे नाव आहे. अपहरण नाट्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सदरची घटना मंगळवार दि. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजलेच्या सुमारास घडली. अपहरण झालेला विद्यार्थी शुभम घुटे हा विद्यार्थी पूर्णतः घाबरलेल्या अवस्थेत मढेवडगव येथे आढळला. यावेळी त्यांनी सदरच्या प्रकरणाबाबत माहिती दिली.

नेहमीप्रमाणे सुरेगाव येथील श्री श्रीधर स्वामी विद्यालयात शिक्षणासाठी शुभम जात असतो. दररोज शाळेत जाण्यापूर्वी सुरेगाव येथील स्वामी मठात जाऊन स्वामींचे दर्शन घेत असतो. मंगळवार दि.२६ नोव्हेंबर रोजी नेहमीप्रमाणे स्वामींचे दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर पडल्यानंतर अज्ञात दोन ते तीन व्यक्ती चार चाकी वाहनातून उतरले. त्यामधील एका जणांनी तोंडावर रुमाल टाकला त्यानंतर बेशुद्ध पडल्याचे सांगितले. शुद्धीवर आल्यानंतर नंतर त्यांनी मढेवडगाव येथील आदिरा हॉटेल समोरील जंगलात बेशुद्ध अवस्थेत सोडून दिले. त्यानंतर काहीच कळेना असे झाले.

त्यानंतर अनेकांनी माझी विचारपूस केल्यानंतर माझे काही नातेवाईक तेथे आले. अशी माहिती अपहरण झालेल्या विद्यर्थ्यांनी दिली. त्यानंतर सदर अपहरणाचे कोडे उलगडले. दरम्यान श्रीगोंदा तालुक्यात शालेय विद्यार्थ्यांच्या अपहरण नाट्यामुळे वाडी वस्तीवरून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अपहरणाचे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी अधिक दक्ष राहून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पालकांमधून केली जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राखेतून फिनिक्ससारखी भरारी — माजी सैनिक नवनाथ खामकर यांचा संकल्प एस. मार्ट पुन्हा उभा

  श्रीगोंदा / नगर सह्याद्री - राखेतून पुन्हा जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्षासारखी किमया श्रीगोंद्यात पाहायला मिळाली...

स्थानिक स्वराज्य संस्थांनच्या निवडणुका संभाजी ब्रिगेड ताकदीने लढवणार – इंजी. शामभाऊ जरे

श्रीगोंदा / नगर सह्याद्री दिवाळीनंतर होणाऱ्या नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी संभाजी ब्रिगेड...

ओबीसी आरक्षण कमी झाल्याचा पुरावा आहे का? राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - ओबीसी आरक्षणावरून शुक्रवारपासून वातावरण पुन्हा तापले आहे. बीडमध्ये ओबीसी...

अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना 846 कोटी 96 लाख रुपयांची मदत; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर...