spot_img
महाराष्ट्रराजकारणात पुन्हा भूकंपाचे संकेत, 'तो' बडा नेता व अजित पवार यांचा एकाच...

राजकारणात पुन्हा भूकंपाचे संकेत, ‘तो’ बडा नेता व अजित पवार यांचा एकाच गाडीने प्रवास

spot_img

पुणे / नगर सह्याद्री : लोकसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. आता येणाऱ्या काही दिवसात काही राजकीय भूकंप घडण्याची चिन्हे दिसत आहेत.
मोठमोठे नेते आपले पक्ष सोडून वेगळ्या पक्षात पक्षप्रवेश करण्याची शक्यता आहे. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील एका बड्या नेत्यासोबत एकाच गाडीने प्रवास केला असल्याचे वृत्त आले आहे. याच नेत्याला अजित पवार गटातून लोकसभा निवडणुकीची उमेदवारीची संधी दिली जाण्याची चर्चा आहे. हा बडा नेता म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे शिवाजी आढळराव पाटील. शिवाजी आढळराव पाटील यांनी नुकतंच त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली होती. त्यानंतर आता अजित पवार आणि शिवाजी आढळराव पाटील यांनी एकाच गाडीने प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते शिवाजी आढळराव पाटील यांनी एकाच गाडीने प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार, मंत्री दिलीप वळसे पाटील आणि शिवाजी आढळराव पाटील यांनी एकाच गाडीने प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे. विविध विकासकामांचं उद्घाटन आणि शेतकरी मेळाव्यासाठी या तीनही नेत्यांनी उपस्थिती लावली. त्यानंतर तीनही नेत्यांनी एकाच गाडीने प्रवास केला. या भेटीवर अजित पवार काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष आहे. विशेष म्हणजे शिरुर लोकसभेच्या जागेतून शिवाजी आढळराव पाटील यांच्या उमेदवारीची देखील घोषणा आता होऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करुन घड्याळ चिन्हावर निवडून आणण्यासाठी शिवाजी आढळराव पाटील यांची तयारी आहे, अशी सर्वत्र सध्या चर्चा सुरु आहे. पण शिवाजी आढळराव पाटील यांच्या पक्षप्रवेशावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी आक्षेप घेतलाय. शिवाजी आढळराव पाटील यांनी आपल्याला जेलमध्ये टाकण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्यासोबत आपलं अनेक वर्षांपासून राजकीय वैर आहे. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला तर आपण राजकारण सोडू असं मोहिते पाटील म्हणाले आहेत. त्यामुळे आता अजित पवार काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...

संतापजनक! पंढरपूरला निघालेल्या वारीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Maharashtra Crime News: आषाढी वारीसारख्या भक्तिभावाच्या पर्वात दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे घडलेल्या एका...

आमदार रोहीत पवार यांना धक्का; जवळच्या सहकार्यावर अविश्वासाचा ठराव..

जामखेड । नगर सहयाद्री:- कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांच्यावर अविश्वास ठराव...