spot_img
ब्रेकिंगसरकार बरखास्त करा, राष्ट्रपती राजवट लावा; ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

सरकार बरखास्त करा, राष्ट्रपती राजवट लावा; ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरण चर्चेत असतानाच दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणावरुन शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त करत राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

“गेले काही दिवस महाराष्ट्रामध्ये उद्विग्न अस्वस्थता आहे. डोळ्यासमोर जी काही बेबंधशाही सुरू आहे. महाराष्ट्र काय आहे हे माहीत नसलेले निर्ढावलेले पणे बोलत आहेत. पण महाराष्ट्रातील लोकांची मन दुखावली आहेत, गुंडांचा हैदोस महाराष्ट्रामध्ये सुरू आहे.. सरकारमध्ये गँगवार सुरू आहे,” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
“अभिषेक घोसाळकरची हत्या झाली. त्यानंतर या गुंडाने स्वतः आत्महत्या का केली? फेसबुक लाईव्हमध्ये गोळ्या घातल्या, पण गोळ्या कोण घालतंय हे त्यात दिसत नाही. बॉडिगार्डच्या बंदुकीने त्याने गोळ्या घातल्या असं सांगितलं जातंय, पण त्या मॉरिस ला बॉडीगार्ड का ठेवावा लागला? त्या दोघांची सुपारी कोणी दिली होती का?” असा गंभीर सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

“गाडीखाली श्वान आला तरी राजीनामा मागतील असंच बोलले ना. श्वान हा संस्कृत शब्द बोलल्याने सुसंस्कृत होत नाही. निर्ढावलेला, निष्ठूर आणि निर्दयी गृहमंत्री आहे. आम्ही राज्यपालांकडे जाणार नाही. आम्ही आपल्या माध्यमातून मागणी करतो राज्य बरखास्त करा, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा आणि लवकर निवडणुका लावा,” अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘नीट’ परीक्षेत कमी गुण मिळाल्याने मुख्याध्यापकाने घेतला लेकीचा जीव, कुठली घटना पहा

सांगली / नगर सह्याद्री : सांगली जिल्ह्यात ‘नीट’च्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे १६ वर्षीय...

‘जिजाऊ ब्रिगेड’चा हुंडाबळी रोखण्याचा संकल्प, पहा सविस्तर

महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आढावा बैठक अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर येथे जिजाऊ ब्रिगेड...

“युद्ध तुम्ही सुरू केलं, पण आता… ; इराणचा अमेरिकेला कडक इशारा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या इराण-इस्रायल लष्करी संघर्षात काल...

साईभक्तांसाठी आनंदाची बातमी: आता वेळ वाचणार, संस्थानकडून नवा निर्णय

शिर्डी / नगर सह्याद्री - साई संस्थानच्या या निर्णयामुळे सामान्य साईभक्तांना मोठा दिलासा मिळणार...