spot_img
महाराष्ट्र'मनोरुग्ण गृहमंत्री राज्याला लाभलाय', उद्धव ठाकरे यांची फडणवीस यांच्यावर अत्यंत जहरी टीका

‘मनोरुग्ण गृहमंत्री राज्याला लाभलाय’, उद्धव ठाकरे यांची फडणवीस यांच्यावर अत्यंत जहरी टीका

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. काल राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावरुन विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केला होता. राज्यात गाडीखाली एखादा श्वान जरी मेला तरी विरोधक जाब विचारतील, ही घटना तर मोठी आहे त्यामुळे विरोधक जाब विचारणारच असे ते म्हणाले होते. परंतु आता यावरून उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर मोठा घणाघात केलाय.

फडणवीस हे जे बोलले, त्यांनी श्वान शब्द वापरला. संस्कृत शब्द वापरला म्हणून ते सुसंस्कृत होत नाही. देवेंद्र फडणवीस यांना मी फडतूस, कलंक बोललो पण आता काही शब्द नाहीत, मनोरुग्ण गृहमंत्री राज्याला लाभलेला आहे. ते निर्ढावलेले आहेत, सर्वांच्या जीवाची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही स्वत: दिल्लीत जाऊन दिल्लीश्वरांसमोर शेपटी हलवता, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

ठाकरे म्हणाले, सरकार हे पोलिसांच्या मागे ठामपणे उभं राहण्याऐवजी गुंडांच्या मागे उभं रहात असेल तर कठीण आहे. राज्यात गुंडगिरी वाढणार. पूर्वी एक जाहिरात होती मेलेडी खाओ सब जान जाओ. आता अशी परिस्थिती आहे ती ‘भाजपमे आओ सब भूल जाओ’ ही मोदी गॅरेंटी आहे. सरकार गुंडांच्या मागे उभं राहिलं तर अशीच गुंडगिरी राहील. यापुढच्या पिढ्या, आपलं भवितव्य गुंडांच्या हाती देणार आहात का असा जनेतला प्रश्न जनतेला विचारायचा आहे. आम्ही राज्यपालांकडे जाणारच नाही. मी तुमच्या माध्यमातून सांगतोय की हे सरकार बरखास्त करा. राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

वैष्णवी हगवणेचा मृत्यू कसा झाला? पोस्टमार्टममधून धक्कादायक माहिती समोर

पुणे / नगर सह्याद्री - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांच्या...

धक्कादायक! मुख्याध्यापिकेनेच शिक्षक पतीला संपवलं, मृतदेह टाकला जाळून, कुठे घडला प्रकार पहा

यवतमाळ / नगर सह्याद्री - महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात एक खळबळजनक हत्याकांड उघडकीस आले आहे....

IAS पूजा खेडकर प्रकरणात मोठी अपडेट; ‘सर्वोच्च न्यायालयाने जामीन..’

मुंबई । नगर सहयाद्री:- वादग्रस्त ठरलेल्या माजी आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांना सर्वोच्च...

नगर जिल्ह्यात खळबळ! बिबट्या अडकला पिंजऱ्यात; एकाच ठिकाणी चार-चार?

अहिल्यानगर। नगर सहयाद्री :- अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार बुद्रुकमध्ये एकापाठोपाठ चार बिबटे जेरबंद करण्यात आले...