spot_img
ब्रेकिंगसुखी संसारावर विरझण! पाण्याची टाकी अंगावर पडून तरुणाचा मृत्यू

सुखी संसारावर विरझण! पाण्याची टाकी अंगावर पडून तरुणाचा मृत्यू

spot_img

सोलापूर। नगर सह्याद्री-
सोलापूरमध्ये एक दुर्देवी घटना घडली आहे. वीस वर्षांपूर्वीची बांधलेली पाण्याची टाकी कोसळल्याने तरुणाचा मृत्यू झाला असून काही दिवसापूर्वीच लग्न झालेल्या तरुणांच्या सुखी संसारावर विरझण पडले आहे. सद्दाम नदाफ असं मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे.

सविस्तर वृत्त: सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील बबलादमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. बबलादमध्ये ४० हजार लिटरची सार्वजनिक पाण्याची टाकी २० वर्षांपूर्वी बांधण्यात आली होती. बरीच जुनी झाल्याने टाकी गळत देखील होती. टाकीच्या दुरूस्तीसाठी जलजीवन मिशन योजनेतून कामही सुरू करण्यात आले होते.

दरम्यान टाकीचे काम सुरु असतांना कॉलम कट करत असताना टाकी कोसळली. यावेळी तरुण टाकीखाली उभा असलयामुळे तो जागीच ठार झाला. मृतदेह काढण्यासाठी तब्बल ४ तास लागले. तरुणांच्या निधनाने कुटुंबीयांनी मोठा आक्रोश व्यक्त केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शेतकरी संकटात! लष्करी अळी जोमात, मका पीक कोमात..

अप्पा चव्हाण। श्रीगोंदा:- दीड महिन्यापासून पेरणी केलेल्या खरिपातील पिकांना गत पंधरवड्यात झालेल्या पावसाने...

पुणे, कोल्हापूरच्या पार्श्वभूमीवर नगरमध्ये आ. जगताप अलर्ट; आयुक्तांना पत्र देत तातडीने केली ‘ही’ मागणी

अहमदनगर / नगर सह्याद्री - गेल्या काही दिवसांपासून पुणे, मुंंबई, कोल्हापूर येथे पावसामुळे पूर...

‘ज्याला तडीपार केले त्यांच्या हातात गृहमंत्रीपद दिले’ शरद पवार यांचा अमित शाह यांच्यावर पलटवार

छ.संभाजी नगर । नगर सहयाद्री:- माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी देशाचे...

अहमदनगरच्या ‘या’ गावात धाडसी दरोडा! चोरीत चोरटे निघाले हुशार? नेमकं काय घडलं…

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- तालुक्यातील भिमा व घोडनदीच्या संगमावर असणार्या सांगवी दुमाला परिसरामध्ये धाडसी...