spot_img
ब्रेकिंगसुखी संसारावर विरझण! पाण्याची टाकी अंगावर पडून तरुणाचा मृत्यू

सुखी संसारावर विरझण! पाण्याची टाकी अंगावर पडून तरुणाचा मृत्यू

spot_img

सोलापूर। नगर सह्याद्री-
सोलापूरमध्ये एक दुर्देवी घटना घडली आहे. वीस वर्षांपूर्वीची बांधलेली पाण्याची टाकी कोसळल्याने तरुणाचा मृत्यू झाला असून काही दिवसापूर्वीच लग्न झालेल्या तरुणांच्या सुखी संसारावर विरझण पडले आहे. सद्दाम नदाफ असं मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे.

सविस्तर वृत्त: सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील बबलादमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. बबलादमध्ये ४० हजार लिटरची सार्वजनिक पाण्याची टाकी २० वर्षांपूर्वी बांधण्यात आली होती. बरीच जुनी झाल्याने टाकी गळत देखील होती. टाकीच्या दुरूस्तीसाठी जलजीवन मिशन योजनेतून कामही सुरू करण्यात आले होते.

दरम्यान टाकीचे काम सुरु असतांना कॉलम कट करत असताना टाकी कोसळली. यावेळी तरुण टाकीखाली उभा असलयामुळे तो जागीच ठार झाला. मृतदेह काढण्यासाठी तब्बल ४ तास लागले. तरुणांच्या निधनाने कुटुंबीयांनी मोठा आक्रोश व्यक्त केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...

मुख्याध्यापक लंके यांची बदली रद्द करा; रयतच्या कार्यालयासमोर पालकांचे धरणे आंदोलन

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विभागाचे कार्यरत मुख्याध्यापक...

उद्धव-राज एकत्र येणार; पाच जुलैला मुंबईत..

मुंबई । नगर सहयाद्री  महाराष्ट्रातील विरोधी पक्षांचा आक्रमक पवित्रा पाहून देवेंद्र फडणवीस सरकारने हिंदी सक्तीचा...

जामखेडमध्ये धक्कादायक प्रकार! पुन्हा एका बालकाचा मृत्यू; आठ दिवसांतील तिसरी घटना..

जामखेड । नगर सहयाद्री:- क्रिकेट खेळताना स्लॅबवरती गेलेला बॉल फ्लेसच्या लोखंडी पाईपने काढत असताना घरावरील...