spot_img
ब्रेकिंगधनतेरसला काळाचा घाला: ६ भाविकांचा अपघातात मृत्यू, १५ गंभीर, 'या' घाटात पिकअपचा...

धनतेरसला काळाचा घाला: ६ भाविकांचा अपघातात मृत्यू, १५ गंभीर, ‘या’ घाटात पिकअपचा अपघात

spot_img

Accident News : राज्यात दीपोत्सवाची सुरुवात झाली असतानाच धनतेरसच्या दिवशी नंदुरबार जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. सातपुड्यातील अस्तंबा यात्रेवरून परत येणाऱ्या भाविकांच्या पिकअपचा चांदशैली घाटात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत ६ भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून, १५ पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.

प्राप्त प्राथमिक माहितीनुसार, पिकअपमधून २२ ते २३ भाविक प्रवास करत होते. चांदशैली घाटातील अवघड वळणावर वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप खोल दरीत कोसळली. अपघात इतका भीषण होता की, काही भाविकांनी जागीच प्राण सोडले. घटनास्थळी तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना वाहनातून बाहेर काढण्यास मदत केली.

जखमींना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काहींची प्रकृती अत्यवस्थ असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती स्थानिकांनी दिली.तळोदा पोलीस प्रशासनाचे पथकही घटनास्थळी दाखल झाले असून, मदत आणि तपासकार्य सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरु आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ओबीसी आरक्षण कमी झाल्याचा पुरावा आहे का? राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - ओबीसी आरक्षणावरून शुक्रवारपासून वातावरण पुन्हा तापले आहे. बीडमध्ये ओबीसी...

अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना 846 कोटी 96 लाख रुपयांची मदत; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर...

मनसे-महाविकास आघाडीच्या मागणीला यश; निवडणूक आयोगाचे मतदार यादीतील घोळ तपासण्याचे आदेश

मुंबई । नगर सहयाद्री  राज्यातील मतदार यादीमधील घोळ आणि गैरव्यवहाराच्या गंभीर आरोपांनंतर निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना...

साई संस्थानमधील ४७ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल;नेमकं प्रकरण काय?

शिर्डी । नगर सहयाद्री:- साईबाबा संस्थानच्या विद्युत विभागातील तब्बल ७७ लाख रुपयांच्या विद्युत साहित्याच्या...