spot_img
ब्रेकिंगदळभद्री ‘मविआ’ सरकारमुळे राज्याची अधोगती! मंत्री विखे पाटील यांची विरोधकांवर जहरी टीका

दळभद्री ‘मविआ’ सरकारमुळे राज्याची अधोगती! मंत्री विखे पाटील यांची विरोधकांवर जहरी टीका

spot_img

पुणे | नगर सहयाद्री-
राज्यात महाविकास आघाडीचे दळभद्री सरकार होते. त्यांच्यामुळे झालेली राज्याची अधोगती निस्तरण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत आहे, अशी टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

पुणे जिल्ह्यातील दौंड येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत स्वतंत्र उपविभागीय महसूल कार्यालयाचे उद्घाटन व विविध विकासकामांचे भूमीपूजन मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते झाले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

मंत्री विखे पाटील म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महायुतीला साथ मिळाल्याने हे ट्रिपल इंजिन सरकार काम करणार्‍या प्रत्येकाला पाठबळ देत औद्योगिक विकास व रोजगारासह विविध योजनांच्या माध्यमातून सर्वांगीण विकास करीत आहे. महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिसलेच नाहीत.

त्यामुळे जनतेची जबाबदारी घ्यायला कोणी तयार नव्हते. कोरोना काळात लोकांच्या नोकर्‍या गेल्या, उद्योग व व्यवसाय ठप्प झाले असल्याने अडचणीत सापडलेल्या जनतेला वैद्यकीय व अन्य मदतीची नितांत गरज होती. महाविकास आघाडीचे नेते परदेशात व थंड हवेच्या ठिकाणी निघून गेले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली देशाचे अर्थकारण गतीमान होत आहे. उद्योग आणि रोजगारात वाढ झाली असून अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या चीन ऐवजी भारतात गुंतवणुकीला प्राधान्य देत आहे. महाराष्ट्रात गुगल सारखी कंपनी दहा हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे. त्यासाठी भूखंडाची मागणी राज्य सरकारकडे केली आहे, अशी माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

दौंड मतदारसंघाचे आमदार राहुल कुल यांनी स्वागत करत मतदारसंघातील विकासकामांचा आढावा घेतला. माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माण मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे व माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांची यावेळी भाषणे झाली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर तालुक्यात मातब्बर पुढाऱ्यांना धक्का; सरपंच पद झाले आरक्षित, या गावांत ‘महिलाराज’

सुनील चोभे / नगर सह्याद्री - थेट जनतेतून सरपंच निवडण्यासाठी नगर तालुक्यातील 105 गावांची आरक्षण...

अकोळनेर नगरीत भक्तीचा महापूर; दिड लाख भाविकांना पाच लाख पुरणपोळ्याचा महाप्रसाद

जगद्गुरु तुकोबारायांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदैह वैकुंठगमन सोहळ्याची काल्याच्या किर्तनाने सांगता सुनील चोभे / नगर...

अहिल्यानगरमध्ये ऑनलाईन वेश्याव्यवसाय; पोलिसांची मोठी कारवाई..

Ahilyanagar Crime: शिर्डीपासून जवळच असलेल्या एका हॉटेलवर गैरकृत्याचा प्रकार सुरु होता. ओंलीने पद्धतीने बुकिंग...

जामखेडमध्ये रॅगिंगचा धक्कादायक प्रकार; अधिकाऱ्यांकडून केले असे, पहा नेमकं काय घडलं

जामखेड / नगर सह्याद्री : शहरातील आरोळे वस्ती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासी वसतीगृहात...