spot_img
ब्रेकिंगदळभद्री ‘मविआ’ सरकारमुळे राज्याची अधोगती! मंत्री विखे पाटील यांची विरोधकांवर जहरी टीका

दळभद्री ‘मविआ’ सरकारमुळे राज्याची अधोगती! मंत्री विखे पाटील यांची विरोधकांवर जहरी टीका

spot_img

पुणे | नगर सहयाद्री-
राज्यात महाविकास आघाडीचे दळभद्री सरकार होते. त्यांच्यामुळे झालेली राज्याची अधोगती निस्तरण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत आहे, अशी टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

पुणे जिल्ह्यातील दौंड येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत स्वतंत्र उपविभागीय महसूल कार्यालयाचे उद्घाटन व विविध विकासकामांचे भूमीपूजन मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते झाले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

मंत्री विखे पाटील म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महायुतीला साथ मिळाल्याने हे ट्रिपल इंजिन सरकार काम करणार्‍या प्रत्येकाला पाठबळ देत औद्योगिक विकास व रोजगारासह विविध योजनांच्या माध्यमातून सर्वांगीण विकास करीत आहे. महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिसलेच नाहीत.

त्यामुळे जनतेची जबाबदारी घ्यायला कोणी तयार नव्हते. कोरोना काळात लोकांच्या नोकर्‍या गेल्या, उद्योग व व्यवसाय ठप्प झाले असल्याने अडचणीत सापडलेल्या जनतेला वैद्यकीय व अन्य मदतीची नितांत गरज होती. महाविकास आघाडीचे नेते परदेशात व थंड हवेच्या ठिकाणी निघून गेले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली देशाचे अर्थकारण गतीमान होत आहे. उद्योग आणि रोजगारात वाढ झाली असून अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या चीन ऐवजी भारतात गुंतवणुकीला प्राधान्य देत आहे. महाराष्ट्रात गुगल सारखी कंपनी दहा हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे. त्यासाठी भूखंडाची मागणी राज्य सरकारकडे केली आहे, अशी माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

दौंड मतदारसंघाचे आमदार राहुल कुल यांनी स्वागत करत मतदारसंघातील विकासकामांचा आढावा घेतला. माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माण मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे व माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांची यावेळी भाषणे झाली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना; आरतीनंतर नेमकं काय घडलं?

Bageshwar Dham: मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात असलेल्या बागेश्वर धाम याठिकाणी एक मोठी...

तारण ठेवलेले सोने हेल्परने चोरले!, संधी मिळेल तेव्हा टाकायचा डाव..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री ग्राहकांनी तारण ठेवलेले लाखोंचे सोने हेल्परनेच चोरून नेल्याची धक्कादायक घटना...

पोटची मुलगी गेली, भावाची मुलगी मारली; पारनेरमध्ये चुलत्याकडून पुतणीचा खून!

पारनेर । नगर सहयाद्री :- जुन्या रागातून चुलत्याकडून १६ वर्षीय मुलीचा डोयात दगड घालून...

औरंगजेबाविषयी गौरवोद्गार; निघोजमध्ये तणाव; नेमकं काय घडलं?

निघोज । नगर सहयाद्री:- पाच महिन्यापूर्वी येथील एका कुटुंबातील १६ वर्षीय युवकाने औरंगजेबाविषयी गौरवोद्गार...