spot_img
ब्रेकिंगदळभद्री ‘मविआ’ सरकारमुळे राज्याची अधोगती! मंत्री विखे पाटील यांची विरोधकांवर जहरी टीका

दळभद्री ‘मविआ’ सरकारमुळे राज्याची अधोगती! मंत्री विखे पाटील यांची विरोधकांवर जहरी टीका

spot_img

पुणे | नगर सहयाद्री-
राज्यात महाविकास आघाडीचे दळभद्री सरकार होते. त्यांच्यामुळे झालेली राज्याची अधोगती निस्तरण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत आहे, अशी टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

पुणे जिल्ह्यातील दौंड येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत स्वतंत्र उपविभागीय महसूल कार्यालयाचे उद्घाटन व विविध विकासकामांचे भूमीपूजन मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते झाले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

मंत्री विखे पाटील म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महायुतीला साथ मिळाल्याने हे ट्रिपल इंजिन सरकार काम करणार्‍या प्रत्येकाला पाठबळ देत औद्योगिक विकास व रोजगारासह विविध योजनांच्या माध्यमातून सर्वांगीण विकास करीत आहे. महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिसलेच नाहीत.

त्यामुळे जनतेची जबाबदारी घ्यायला कोणी तयार नव्हते. कोरोना काळात लोकांच्या नोकर्‍या गेल्या, उद्योग व व्यवसाय ठप्प झाले असल्याने अडचणीत सापडलेल्या जनतेला वैद्यकीय व अन्य मदतीची नितांत गरज होती. महाविकास आघाडीचे नेते परदेशात व थंड हवेच्या ठिकाणी निघून गेले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली देशाचे अर्थकारण गतीमान होत आहे. उद्योग आणि रोजगारात वाढ झाली असून अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या चीन ऐवजी भारतात गुंतवणुकीला प्राधान्य देत आहे. महाराष्ट्रात गुगल सारखी कंपनी दहा हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे. त्यासाठी भूखंडाची मागणी राज्य सरकारकडे केली आहे, अशी माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

दौंड मतदारसंघाचे आमदार राहुल कुल यांनी स्वागत करत मतदारसंघातील विकासकामांचा आढावा घेतला. माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माण मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे व माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांची यावेळी भाषणे झाली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! स्वदेशी बनावटीचे तेजस लढाऊ विमान कोसळले

नगर सह्याद्री वेब टीम Tejas fighter jet crashes: दुबईमध्ये एअर शो प्रात्यशिकात भाग घेतलेल्या तेजस...

आमदार-खासदारांशी कसं वागणार? सरकारचा कर्मचाऱ्यांना ९ कलमी कार्यक्रम…

आमदार-खासदारांच्या पत्रांना दोन महिन्यांत उत्तर देण्याचं अनिवार्य केलंय / नियम मोडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई...

कुंभमेळ्यासाठी वृक्षतोड; सयाजी शिंदे सरकारवरसंतापले? आम्ही मरायलाही तयार…

मुंबई / नगर सह्याद्री - सयाजी शिंदे हे एक प्रसिद्ध अभिनेते आहेत, त्यांनी मराठी,...

रिक्षा थांबविण्याच्या वादातून रिक्षाचालकावर जीवघेणा हल्ला, नेमकं काय घडलं पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री येथील माळीवाडा बस स्थानक परिसरात रिक्षा थांबवण्याच्या किरकोळ वादातून दोन आरोपींनी...