spot_img
अहमदनगर‘वोट जिहादचे राजकारण’ झुगारून जनता पाठबळ देईल: खा. डॉ. दिनेशकुमार शर्मा

‘वोट जिहादचे राजकारण’ झुगारून जनता पाठबळ देईल: खा. डॉ. दिनेशकुमार शर्मा

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री-
मतांच्या तुष्टीकरणासाठी फतवे काढून कुणी राजकारण करणार असेल तर त्याला जनता थारा देणार नाही. जनता ‘वोट जिहादचे राजकारण’ झुगारून देऊन मतांची क्रांती करून राष्ट्रवादाला पाठबळ देईल असा विश्वास उत्तरप्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे प्रभारी खासदार डॉ. दिनेशकुमार शर्मा यांनी व्यक्त केला.

खासदार दिनेश शर्मा यांनी नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदार संघाचा दोन दिवस दौरा केला. संघटनात्मक पातळीवर पदाधिकारी, कार्यकर्ते युवा वॉरियर्स यांच्याशी संवाद साधून निवडणुकीतील बारकावे त्यांनी जाणून घेतले. नगरमध्येही युवा वॉरियर्स या मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

माध्यमांशी बोलताना डॉ. शर्मा म्हणाले की, राज्यात महायुतीला मोठे यश मिळणार असून २०१९ च्या विधानसभेत राज्यातील जनतेने दिलेल्या जनादेशाचा अवमान करणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवेल. विरोधकांमध्ये आता कोणताही आत्मविश्वास राहिला नाही. विरोधी आघाडीतील प्रत्येक पक्षाला आपल्या अस्तित्वासाठी झगडण्याची वेळ आली आहे.  पराभव समोर दिसू लागल्याने फतवे काढून राजकारण करण्याची वेळ त्यांच्यावर आली असल्याची जोरदार टिका शर्मा यांनी केली.

फतवे काढून वोट जिहादचे राजकारण करणे हे जनतेला मान्य नाही. समाजात सांप्रदायिकता रहावी हीच भाजपाची भूमिका आहे. विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक योजनांचा लाभ समाजातील सर्व घटकांना मिळवून देताना कधीही धर्माचा विचार करून भेद निर्माण होऊ दिला नाही. समाजातील प्रत्येक घटकांची उन्नती हाच योजना सुरू करण्यामागचा विचार आहे. पण केवळ आता मताच्या तुष्टीकरणासाठी फतवे काढले जात असतली तर सुज्ञ मतदार अशा राजकारणाला कधीही साथ देणार नाहीत. जनता राष्ट्रवादाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील वोट जिहादच्या राजकारणाला मतांची क्रांती करून उत्तर देईल असा इशारा त्यांनी  दिला.उध्वव ठाकरे यांनी हिंदूत्वाचा विचार केव्हाच सोडून दिला आहे. त्यामुळे राज्यात सुरू झालेल्या फतव्यांच्या राजकारणाला विरोध करण्याची त्यांची  हिम्मत नसल्याचा टोला डॉ. शर्मा यांनी लगावला.

राहुल गांधी यांनी मतदार संघ बदलावर बोलताना डॉ, शर्मा म्हणाले की, डरो मत असे बोल होते. प्रियंका गांधी ‘मै लढती हू लढती रहुंगी’ असे देशभर सांगत होत्या मात्र निवडणुकीत त्यांची भूमिका ही केवळ राजकीय पर्यटनाची असून निवडणुका झाल्या की त्या लगेच रोम आणि इटलीत दिसतील अशी खोचक प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.

डॉ. दिनेश शर्मा यांनी सकाळी नगरमध्ये आल्यानंतर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमवेत चर्चा केली. या प्रसंगी आमदार मोनिका राजळे तसेच  प्रदेशातून आलेले पदाधिकारी उपस्थित होते. उभयनेत्यांमध्ये मतदार संघातील निवडणुकीच्या प्रचाराबाबत सखोल चर्चा झाली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र सुजित झावरे यांची पत्रकार परिषदेत माहिती शनिवारी अजित पवार...

केडगावमध्ये पुन्हा घडलं भयंकर! २७ वर्षांच्या तरुणावर सपासप वार? कारण आलं समोर..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- हात ऊसने दिलेल्या पैशाची मागणी करणार्‍या तरूणावर चाकूने हल्ला केल्याची...

दादांच्या आमदाराला साहेबांचा पाठिंबा? सब एक है! ‘वेळ आल्यावर..’;विद्यमान आमदारांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण..

Politics News: राज्यात निवडणुकीच बिगुल वाजलं आहे. आता पक्ष, नेते, उमेदवार निवडणुकीसाठी तयारीला लागले...

अहिल्यानगर ब्रेकिंग! अजय महाराज बारस्करांच्या घरी राडा? प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद, दोन तरुण ताब्यात..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातून एक बातमी समोर आली आहे. अजय महाराज बारस्कर यांच्या...